tag:blogger.com,1999:blog-84731512024-02-21T10:04:02.592-08:00Out of my mindMy blabbering, random thoughts, readings and alike...
An attempt to know myself better and understand my relationship with those connected to me as I continue to evolveUnknownnoreply@blogger.comBlogger74125tag:blogger.com,1999:blog-8473151.post-78264862357143893882021-06-16T18:58:00.004-07:002021-06-17T07:29:45.661-07:00आभासी खाणं! <p> </p><div>आभासी खाणं! </div><div><br /></div><div>ते काही नाही आता फार झालं! मी आता मार्ककडं निषेध मोर्चाचं नेणार आहे आणि मला खात्री आहे कि मी एकटा नसेन - माझ्यासारखे अनेक ह्याने पोरखळलेले असणार! अगदी तुमच्यातले काही सुद्धा! <br /></div><div><br /></div><div>काय नाही कळलं? अहो, हो मी झुकरबर्ग पुत्र मार्क बद्दलच बोलतोय! तो आणि त्यानं आम्हाला लावलेलं फेसबुकचं व्यसन. चार नवीन मित्र जोडावेत, जुने मित्र शोधावेत, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून फेसबुकशी जोडला गेलो तर ते आता चांगलंच अंगाशी आणि तोंडाशी आलंय आणि अक्षरशः तोंडघशी पडायची वेळ आलीय. <br /></div><div>कसं ते सांगतो. एक तर ह्या कोरोनामुळे गेलं वर्ष दिडवर्ष कुठेही बाहेर जाता येत नाहीये. त्यामुळे साहजिकच फेसबुकवर माझी उठबस (खरं तर इथे "बस"णेच जास्त!) वाढली. सुरुवातीला नवीन मित्र आणि काही जुन्या मैत्रिणीशी (हाय.. एक छोटी कळ आल्यासारखं वाटलं छातीतून!) संपर्क झाला. मार्कने जणू तर आमच्यावर नजरच ठेवली होती.. रोज मला अगदी नवीन नवीन मित्र/मैत्रिणी सुचवू लागला. आता नाव ओळखीची वाटली आणि या वयात कोण कसा दिसत असेल ह्या उत्सुकतेपायी मी धडाधड सगळ्यांना माझ्या मित्र-वर्तुळात (friend circle हो!) सामावून घेतलं. आता मार्कचं अल्गोरिथम फार काही परिपूर्ण नसल्यानं त्यात काही आमच्या सौंच्या मैत्रिणीपण जोडल्या गेल्या. आता तुम्हीच सांगा 'मानसी नाईक, भावना प्रधान, केतकी कुलकर्णी'' या नावानं आलेल्या फ्रेंड रीक्वेस्ट कोण बरं अव्हेरू शकेल? <br /></div><div><br /></div><div>सुरुवातीचे दिवस खूप छान होते. सगळं काम घरून सुरु होतं. बाहेर जाण जरी बंद झालं तरी फेसबुकमुळे सगळे जणू रोज आवर्जून घरी येत होते.
मग जुनी शाळा, तेंव्हाचे शिक्षक, कोण कुठे आहे, काय करतो, कुणाचे कुणाशी लग्न वगैरे गप्पा झाल्या. लहानपणी खाल्लेल्या चिंचा बोरं आवळ्यापासून वाटून खाल्लेल्या डब्याच्या आठवणी दाटून आल्या. पूर्वी क्वचितच गेलेल्या हॉटेलिंगचे दिवस आठवले. कुठल्या हॉटेल मध्ये काय चांगलं मिळायचं याच स्मरणरंजन झालं. कुठली हॉटेल बंद पडली यावर हताश सुस्कारे सोडून झाले! आणि या मध्ये कुणीतरी पदार्थ करून त्याचे फोटो टाकायची टूम काढली आणि हा उपक्रम सुरु झाला. <br /></div><div><br /></div><div>झालं - मग काही विचारू नका! एकीने काहीतरी करावं, दुसऱ्यांनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडावा, कमेंट्स कराव्यात आणि त्यावर कुरघोडी करण्याच्या सुप्त उद्देशाने तिसरीने आणखी एक फोटो टाकावा ही प्रथा सुरु झाली! आता खोटं कशाला बोला, नाही म्हणायला मलाही सुरुवातीला हा प्रकार आवडला.. कुणीतरी पोहे करावेत, त्यावर छान कोथिंबीर, खोबरे घालून सजवावेत आणि तो फोटो शेअर करावा.. मग त्याच्याशी स्पर्धा म्हणून कुणीतरी शिरा, उप्पीट, मिसळ अशा पदार्थांची रांग लावावी. त्यांना शह देण्यासाठी कुणी एकीने चकल्या, चिरोटे कड मोर्चा वळवावा तर त्याला काटशह देण्यासाठी कुणीतरी थेट पुरणपोळीची वर्णी लावावी! अहाहा.. एकेक फोटो बघून, त्यावरची वर्णन वाचून, कमेंट्स पाहून जीव सुखावला नाही तरच नवल! आता नाही म्हणायला 'थोडं अहो रूपं अहो ध्वनी' झालं - पण ते होणं स्वाभाविकच होत. अहो मार्कबाबांचा सगळा धंदाच यावर आधारित आहे म्हणा! हे छान फोटो बघून मलाही चार घास जास्त जात होते. (घरूनच काम सुरु होत त्यामुळं ऑफिसाचे कपडे घालण्याची सक्ती नव्हती त्यामुळे त्या चार घासाची करामत काही कळलं नाही) घरचा अंमळ बेचव उपमा खात असताना कुणी अस्मिता कुलकर्णीच्या हातचा उपमा आपण खात आहोत अशी कल्पना करावी - आणि त्याला काय वेगळीच चव येते हे तुम्ही स्वतः करून पाहिल्याशिवाय नाही कळणार! अर्थात सोयीने पदार्थ आणि करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलण्याची मुभा आहे. <br /></div><div><br /></div><div>अर्थात ह्या सगळ्या प्रकारात वेळी अवेळी भूक लागणं, भूक लागलेली नसतानाही लाळ टपकण, असे प्रकार घडतात. पण ते सारे क्षम्य आहेत. <br /></div><div><br /></div><div>सगळं छान सुरु होत पण आंतरराष्ट्रीय महिला दिन आला आणि परत कुणाच्या तरी सुपीक (!) डोक्यातून कल्पना आली की त्यादिवशी पुरुषांनी काहीतरी करून खायला घालायचं आणि त्याचे फोटो टाकायचे. मग काही उत्साही पुरुषांनी खरोखरीच हा प्रकार सुरु केला. यातले काहीजण पुढे हॉटेल मॅनेजमेंट करणार होते, मोठे शेफ बनणार होते, पण त्यांच्या दुर्दैवाने (आणि आपल्या सुदैवाने) बी कॉम करून कुठल्यातरी बँकेत चिकटले होते. त्यांच्या सुप्त इच्छा उफाळून आल्या असणार आणि लगेच त्यांनी हौस भागवली असणार. बर तर बरं फक्त पदार्थाचा फोटो टाकावा तर ते नाही, ह्या मंडळींनी स्वतः
ऍप्रन
घालून, किचन मध्ये काम करतानाची सेल्फी टाकायचे नवीन फॅड सुरु केलं! सगळे तुंदीलतनु लेकाचे - स्वतःची ढेरी देखील त्या ऍप्रन मध्ये बसत नव्हती, पण हौस बघा लेको! मी २/४ दिवस चालढकल केली पण ह्या नवीन मित्र मैत्रिणींनी काही पिच्छा सोडला नाही. मग हिनेच केलेल्या ऑम्लेट सँडविच चा फोटो टाकला आणि खाली "हॅप्पी वूमेन्स डे!" असं लिहून टाकलं! सुरुवातीला दोन चार मित्रांनी कौतुक केलं, पण त्या कौतुकात "फोटो किती छान आलाय, अंड्याचा पिवळा रंग कसा सुंदर दिसतोय" अशा प्रकारची टिप्पणीच जास्त होती. (असो,एकेकाचं नशीब!) पण तेवढ्यात कुणी क्षमा नामक युवतीने आमच्या सौना टॅग केलं. झालं या कृतीला आमच्या घरी मात्र क्षमा नव्हती! त्यावरून घरी जो हलकल्लोळ झाला तो काय विचारता! मी एका कृतीत किती चुका केल्या त्याच पुन्हा पुन्हा उच्चारण झालं. दुसऱ्या व्यक्तीनं (म्हणजे हिने) केलेल्या पदार्थाचा नकळत फोटो काढून तो परस्पर असा स्वतःची कलाकृती म्हणून जाहीर करणं, त्याच श्रेय ढापणं आणि वर त्याची सोशल मीडिया वर खोटी जाहिरात करणं! किती अनन्य अपराध! याच परिमार्जन करण्यासाठी काय करावं लागलं ते माझं मला माहित. एकतर माझ्या सर्व नवीन मित्र मैत्रिणीची यादी तपासण्यात आली त्यातील सौंच्या मैत्रिणींना फ्रेंड लिस्ट मधून वगळावं लागलं.. (बिचाऱ्या मानसी, भावना, केतकी किती गैरसमज झाला असेल त्यांचा!) शिवाय केलेल्या अपराधाची सजा म्हणून गेले कित्येक दिवस मला स्वयंपाक करावा लागला. त्याचे फोटो काढण्यास अजिबात परवानगी नव्हती. जे तयार होईल, जसे तयार होईल तसे खाणे भाग पडले. <br /></div><div><br /></div><div>अजूनही मला फ्रेंड रिक्वेस्ट येतात पण आता जरा मी सावधानतेने पावले उचलतो आहे. पाक कला स्पर्धा, पाककृती अशा पोस्ट अजून येत आहेत, त्यात आता व्हाट्सअँप ची भर पडली आहे. आणि हे सगळे बंद होणे गरजेचे आहे. त्यासाठीच मी मार्कच्या घरी मोर्चा नेणार आहे. या विषयावर संसदेत चर्चा घडावी, कायद्याने यावर बंदी यावी आणि माझ्यासारख्या अनेक जणांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी मी कटिबद्ध आहे. मोर्चाची तयारी? हो करणार आहेच - फक्त आज थालीपीठ करण्याची हिच्याकडून ऑर्डर आहे ती पूर्ण झाली की तीही करेन! <br /></div><div><br /></div><div> <br /></div><div><br /><br /></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-3389618298942770762020-06-06T12:57:00.003-07:002020-06-06T12:57:40.444-07:00कोरोना जनजागृती आणि मी <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<br /></div>
<div>
पुलंची क्षमा मागून - त्यांच्याच प्रेरणेने.. </div>
<div>
<br /></div>
<div>
- सागर साबडे </div>
<div>
<br /></div>
<div>
तसं पाहिलं तर स्वयंसेवा (vounteer) करण्याचा माझा मूळ स्वभाव नाही. पण ऑफिसतर्फे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहिमेत माझा स्वयंसेवक म्हणून समावेश का करण्यात आला ते मला अद्याप कळलेले नाही. (मागच्या महिन्यात आमचे रोखपाल कुशाभाऊंशी वाद घातल्यानं त्यानं हे घुसडलं असा माझा संशय आहे!) तरीही कोरोनाची साथ वाढू नये ह्या सद्हेतूने मी ते सुरु केले. दिलेल्या क्रमांकावर फोन करून ह्या रोगाबद्दल आणि "सोशल डिस्टंसिन्ग" बद्दल माहिती द्यायची होती असं साधारण काम होतं. नंबर कुणाचे आणि कुठले ते मात्र माहिती नव्हतं! फोन वर भेटलेले एकेक नमुने व आमचे संभाषण मुद्दाम देत आहे. न जाणो भाषाशास्त्रज्ञांना कधीकाळी ते उपयुक्त ठरावे! </div>
<div>
<br /></div>
<div>
पहिला फोन लागला ते घर नक्की मुंबईला असणार. कारण माणसाचा आवाज सोडून बाकी गोष्टी प्रामुख्याने ऐकू येता होत्या. रेल्वेचे, गाड्यांचे हॉर्न, रेल्वेचे धडधड आवाज, भाजीवाल्यांची हाळी अशा सर्व आवाजाचे एक संमिश्र मिश्रण मला आधी ऐकू आलं. त्या गदारोळातून "हॅलो" ऐकू आल्यावर मी कोरोनाबद्दल माहिती दिली. दोन माणसात सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सांगताच उत्तर आलं "ते काय ना साहेब माझ्याच घरात ६ माणसं आहेत!अंतर वाढवत गेलो ना तर पार नालासोपाराला पोहोचू ! अहो इथं लोकल ट्रेन मध्ये चौथ्या सीट साठी जीव देणारी माणसं आम्ही आणि कसलं ६ फूट अंतर ठेवायला सांगता?" हे ऐकल्यावर आलेला उमाळा दाबत व कुंठीत झालेल्या मतीने मी फोन ठेवून दिला! </div>
<div>
<br /></div>
<div>
सद्गतीत अवस्थेतच मी दुसरा फोन लावला. मला "हॅलो" च्या आधी -- नव्हे ऐवजी -- खालील स्वर ऐकू आले: </div>
<div>
"काय साली कटकट आहे - झोपेच्या वेळी! अगं १ ते ४ रिसिव्हर काढून ठेवायला सांगितलं होतं ना तुला .. कोणये?". हा फोन पुण्याला लागलाय हे मला लगेच कळलं! मी जरा दबक्या आवाजातच कोरोना जनजागृती बद्दल फोन करतोय हे सांगून जुजबी माहिती दिली. यावरच उत्तर मिळालं: "काय हो तुम्ही पुण्याचे दिसत नाही! भर दुपारी फोन करून झोपमोड करून हे असलं फालतू काय सांगता? आणि अंतराचं आम्हाला काय शिकवता? "राखावी बहुतांची अंतरे" हे तर आम्ही बालपणीच शिकलोय!" एवढं बोलून त्या गृहस्थांनी फोन एवढ्या जोरदार आदळला की मी साडेतीन इंच उंच उडालो. एकेकाळच्या - हो आता एकेकाळच्याच म्हणायला हवं - विद्येच्या माहेरघरातून अशी मुक्ताफळे ऐकून मी शिक्षणाच्या चिंतने व्यथित झालो नसतो तरच नवल!</div>
<div>
<br /></div>
<div>
या संभाषणानंतर जरा धास्तावून ४ पर्यंत थांबून पुढचा फोन लावला. तेंव्हा ऐकू आलेले उत्तर असे: </div>
<div>
"कोणे हे बे? फोन कशाला करून राहिले?" राज्याच्या उपराजधानीपर्यंत स्वर गेल्याचं ध्यानी येताच मी कोरोनाबद्दल माहिती दिली. हा आजार कसा पसरतो ते सांगितलं. पण यावरचे अफाट उत्तर ऐकून अचाट झालो. </div>
<div>
"कोरोना ना इथे येऊच शकत नाही ना भाऊ.. अहो आमचा उन्हाळा सहनच नाही होत कुठल्या विषाणूला -- सगळे आपलं पाणी पाणी करून मरून जातात.. आमच्या म्युनिसिपाल्टीच बजेट बघा ना भाऊ -- जंतुप्रादुर्भावासाठी अगदी कमी बजेट ठेवावं लागतं! आणि गर्मीच एवढी आहे की सगळे लांबलांबच राहतात ना .. तर आम्हाला हे काही बाधूच शकत नाही ना "</div>
<div>
<br /></div>
<div>
पुलंनी रंगवलेली तीन शहरातली व्यक्तिमत्व अशा तऱ्हेने एकाच दिवसात अनुभवता आल्याने मी धन्य झालो!</div>
<div>
<br /> </div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-91169624084614124242019-12-29T10:37:00.001-08:002019-12-29T10:37:24.311-08:00इष्टीची खिचडी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
सातारला आमच्या घरासमोर अग्निहोत्र होतं. तेथे अहोरात्र होम
पेटलेले असत. शास्त्रानुसार घरात अग्निहोत्र असेल तर ते सतत तेवत ठेवाव
लागते. घरातील स्त्रीला गावाबाहेर जाता येत नसे. म्हणजे एकदा का लग्न करून
मुलगी घरी आली कि तिचं माहेर तुटलंच जणू! शिवाय अग्निहोत्राचं सोवळं कडक
असायचं. अग्निहोत्र करणारे गुरुजी त्या बाबतीत जास्तच कडक होते. त्यांना
गावात खूप मान होता. त्यांच्या बायकोला (आजींना) सर्वजण काकू म्हणत.
त्यांचं नाव मला अजूनही माहिती नाही! त्या माझ्या आजीच्या समवयस्क
असाव्यात. माझे आजोबा संस्कृत पंडीत होते त्यामुळे न शिकताही आजीला
संस्कृत उच्चार कुठले स्पष्ट वगैरे कळायचं. दर महिन्यात बहुतेक संकष्टी
चतुर्थीला अग्निहोत्र चालायचं. त्याला इष्टी म्हणायचे. कदाचित कानडी शब्द
असेल कारण त्या नंतर तो मी परत कधी ऐकलेला नाही. त्यावेळी अनेक भटजी
यायचे आणि मोठ्याआवाजात मंत्रोच्चारण करायचे. सगळं वातावरण कसं भारलेलं
असायचं. शाळेत जाताना आठवणीने अग्निकुंडाला नमस्कार करून जा असं आजी
सांगायची. नमस्कार केला की गुरुजी थोडं भस्म हातात द्यायचे किंवा कपाळाला
लावायचे. कदाचित वयाचा परिणाम असेल पण ते लावलं कि आता आपल्याला कुठलाच
आजार होणार नाही, बाधा होणार नाही असा समज दृढ व्हायचा. त्या दिवशी
परीक्षा असेल तर पेपर सोपा जाणार असं उगाचंच वाटायचं (कदाचित थोडे दैववादी
असण्याचे दिवस होते!)<br /><br />होमहवन संपलं कि सगळ्या भटजींना
जेवण/अल्पोपहार असायचा. तो झाला कि त्या समोरच्या काकू पटकन यायच्या,
दाराची कडी वाजवायच्या आणि गरम खिचडीच भांड घराबाहेर ठेवायच्या. त्यांच्या
सोवळ्यामुळे आम्हाला त्यांच्या हातातून भांड घेता येत नसे. कदाचित कडक
सोवळ्यामुळे सावली पडलेलीही चालत नसावी. त्यामुळे दाराची कडी वाजवून परत
जाऊन त्या त्यांच्या घराच्या दारात थांबायच्या आणि मी किंवा आई ने दार
उघडलं कि छान हसायच्या. कदाचित सोवळ्याच्याच भाग असेल किंवा त्यावेळची
गडबड असेल पण त्या खिचडी द्यायच्या तेंव्हा कधीच काही बोलायच्या नाहीत. पण
त्यांच्या नजरेत खूप प्रेम आणि आर्द्रव असायचं. मला/ घरातल्याना खिचडी
मिळावी म्हणून केलेली धडपड असायची. खूप वर्ष झाली पण त्या खिचडीची चव अजून
जिभेवर रेंगाळते आणि वास नाकात घुटमळतो आहे. छान फुललेला साबुदाणा,
व्यवस्थित कापलेले बटाटे, अगदी चवीपुरती मिरची आणि वर भरपूर खोबरे आणि
कोथिंबीर. अहाहा! काय स्वर्गीय आनंद असायचा.. परत तशी खिचडी खायला कधीच
मिळाली नाही. घरी नाही, हॉटेल मध्ये तर नाहीच नाही.. कदाचित त्यांच्या
भक्तीचा झालेला पवित्र स्पर्शच त्या खिचडीला ती चव बहाल करत असावा..</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2ePGgzUQU_3iBttLqiGZt8UNaBEYCFHMWw7KbJ53F__751V8BpiFjsqr9QPtF4rV3zNgnYH0U9IkdobRzxX_MWG2SPQy7Z0qoCw9Brg6R7HiMF0fBKyFSHq3AsK6y2cNpcesnFw/s1600/khichadi.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="712" data-original-width="720" height="395" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2ePGgzUQU_3iBttLqiGZt8UNaBEYCFHMWw7KbJ53F__751V8BpiFjsqr9QPtF4rV3zNgnYH0U9IkdobRzxX_MWG2SPQy7Z0qoCw9Brg6R7HiMF0fBKyFSHq3AsK6y2cNpcesnFw/s400/khichadi.JPG" width="400" /></a></div>
<div>
<br /></div>
<div>
मला
खिचडी आवडते आणि अजूनही कधीही साबुदाणा खिचडी खाल्ली कि मला त्या काकू आणि
त्यांचे अनवाणी पाय, आणि प्रेमळ डोळे आठवतात. केवळ अग्निहोत्राला समर्पित
त्यांचं पावन जीवन आठवत आणि का कुणास ठाऊक पण त्यावेळच्या खिचडीच्या
आठवणीने डोळे भरायच्या घाईला येतात.
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-63039443444292893092019-08-06T11:22:00.002-07:002019-08-09T13:32:30.355-07:00सुरुवात <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">कुठून बर सुरुवात करू?</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">हे बघा माझं ना असच होतं नेहमी.. म्हणजे खूप गोष्टीत मला ना कुठुन सुरुवात करायची तेच कळत नाही.. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">माझ्यातल्या कमतरतेबद्दल आमच्या हिन जी केकावली रचली आहे त्यातल्या ह्या एकाच पदावर आमचं एकमत आहे</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">. . तर सुरुवात करण्याबद्दल.. म्हणजे उदाहरणार्थ घरात खूप पसारा झाला असेल तर तो कुठून आवरायला सुरुवात</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> करायची ते मला कळत नाही आणि मग तो दिवसेंदिवस वृद्धिगंत होतो आणि माझी समस्या अधिक जटील करतो ! </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">एखादी अपरिचित व्यक्ती भेटली किंवा कुणी माझी नवीन माणसाशी ओळख करून दिली तर बोलायला सुरुवात कुठून </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">करावी ते मला कळत नाही! </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">कुणाला पत्र लिहायचं झालं तर मायना काय लिहायचा ते मला समजत नाही! एकदम मसुदा लिहून पाठवलेली अनेक </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">पत्रे उलट टपाली मला परत आलेली आहेत!</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">बफे जेवण पद्धतीत ताटात सुरुवातीला काय वाढून घ्यावं ते माझ्या लक्षात येत नाही. म्हणजे अनेकदा सुरुवातीचे पदार्थ </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">घेतल्यामुळे इतरांना न्याय देता येत नाही आणि "खाद्याभ्यासाला" (survey of foods) जावं किंवा उलटीकडून पदार्थ </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">घ्यायला जावं तर रांगेतील लोक "पहिल्यांदाच बफे मध्ये आलेला दिसतोय - मॅनर्स नाहीत!" अशा नजरेनं बघतात व </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"जेवण नको नजरा आवर" असे म्हंणण्याची पाळी येते.</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">दर वर्षी (कधीही सिद्धीस न जाणारे) संकल्प केल्यावर त्याला सुरुवात कुठून करावी हे न कळल्याने घरात डायऱ्या, </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">वजन कमी करण्याची विविध साधने, जिम साठी लागणारे सामान, "सेल्फ हेल्प" ची अनेक पुस्तके ह्याचा पसारा वाढत </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">चाललाय ! एके वर्षी तो पसारा कसा आवरायचा यासाठी पण एक "organize your s(h)elf" नावाचं पुस्तक पण आणलं </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">पण त्याची वाचनाची सुरुवात कुठून नि केव्हा करायची ते उमजलं नाही. ह्याच धर्तीतली "करा सुरु आत्ताच!", </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"just get started", "stop postponing, start living" अशी आणखी काही पुस्तकेही आणली. पण अजून त्यांची पाने </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">सुद्धा फाडून झाली नाहीत!</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">तशी आमची ही खूप मनस्वी आहे (खरा अर्थ: तिच्या मनाला येईल ते मला न सांगता करणारी) त्यामुळे अमुक एका </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">गोष्टीसाठी कधी ती रुसायचे प्रसंग येत नाहीत. पण जर यदाकदाचित ती हिरमुसून बसली असेल तर तिला मनवायला</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> कुठून सुरुवात करावी ते सुद्धा मला कळत नाही. (हा प्रश्न तसा गहन आहे.. या क्षेत्रातील माहीर लोकांनी लेखकाशी </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">स्वतंत्ररित्या संपर्क साधावा हि विनंती).</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">अस्मादिक कॉलेजला असताना कुठून सुरुवात करायची हे न उमजल्याने अनेकजणी त्यांची तारीफ ऐकायला मुकल्या </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">आहेत व नंतर अनेक कविता जन्माला आल्या आहेत!.. (चाणाक्ष वाचकांनी काय ते ओळखावे!). आरंभचोर</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> (आरंभशूर च्या विरुद्ध?) असं काही बिरुद असेल तर ते पटकावण्यात माझा नंबर पहिला असेल.!</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">अर्थातच लमाल च्या लिखाणाच्या बाबतीतही असच होत. मी ह्या विषयावर पूर्वी उहापोह केला होताच </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">(जिज्ञासूंनी 'कल्पना' या विषयावरील आमचे लिखाण अभ्यासावे)</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">तर सांगायचा मुद्दा हा कि मला काही म्हणता काSSही सुचत नाही.. आशिषनं विषयाला अनुसरून चिंतन करायला </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">चांगले २ महिने दिलेले असतात. चैतालीने महिन्यातून स्मरणपत्र (reminder) पाठवून "आता (तरी) लिहा" असं हळूच (?)</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> सुचवलेलं असत..पण जमतच नाही. म्हणजे तसा मी अजिबात आळशी नाही असा माझा समज आहे </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> (माझ्या पत्नीचे याबाबत दुमत असले तरी व्यक्ती व्यक्ती मतेर्भिना: हे चाणाक्ष आणि विवाहित वाचकांना समजण्यासारखे </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">आहे) तरी पण कुठून सुरुवात करायची ते काही नेमकं कळत नाही आणि मग त्यावर सखोल विचार करत असताना </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">शेवटची वेळ येते -- म्हणजे लमाल साठी लिखाण पोस्ट करायचा शेवटचा दिवस उजाडतो! शिवाय पोस्ट केल्याशिवाय </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">वाचायचं नाही असा एकंदरीत शिरस्ता / पायंडा असल्याने मग माझी घिसाडघाई होते. काहीबाही लिहून मोकळं व्हायचं </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">(म्हणजे मग मी नियमितपणे लिहितो हे बिरुद मिरवायला बरं !)</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">पण नाही या वेळी लमाल साठी अगदी वेळेवर लिहायचं ठरवलं आणि लिहायला बसलो. पण काय शेवटी writer's block ! </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">तो काय कुणाला चुकलाय ? अगदी war & peace चा ठोकळा लिहिणाऱ्या टॉल्स्टॉयला पण नाही (असं म्हणतात)! </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">मग काय बसलो आंतरजाल ढुंढाळत.. कमी का विषय आहेत बघायला? शिवाय एका धाग्यातून दुसरीकडे मग तिसरीकडे, </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">अगदी अंतराळात मुक्त सफर करतो आहोत असंच वाटत. मग फिनाईल कसे करावे पासून मंगळावर वस्ती आहे का अ</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">से नानाविध विषय. आणि मी म्हणतो ह्याचा अभ्यास का करू नये माणसानं? म्हणजे उद्या परवा मंगळावर परिभ्रमणासाठी </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">जाण्यासाठी यदाकदाचित माझी निवड झाली तर अडायला नको ना ! ((कोण म्हणलं नाही होऊ शकत?) शिवाय </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">आपला लाडका मार्क आहेच.. त्याने इतके मित्र जोडून दिलेत ना कि त्यांच्या दैनंदिन जीवनात डोकावून बघितल्याशिवाय </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">दिवस सुरु झाल्यासारखं वाटतच नाही.. तसे सगळेच काही ना काही छान लिहीत असतात त्यांच्या आपापल्या भिंतींवर. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">मग त्यांचं लिहिणं आवडलंय असं (खोटं का होईना पण) दाखवणं म्हणजे like करणं, विचारपूर्वक सुयोग्य comment </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">करणं, दुसऱ्यांच्या comments वाचणं परत त्यावर शेरेबाजी करण, प्रत्येक वेळी आलेल्या नवीन कंमेंट्स अभ्यासणे, </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">रोज कुणाचे ना कुणाचे वाढदिवस असतातच त्यांना virtual फुले पाठवून शुभेच्छा देणे.. -- किती तरी काम असतात!</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> बर जर इतर लोक यदाकदाचित Wifi च्या त्रिज्येच्या बाहेर असतील आणि त्यांनी त्यांचे दिवसाचे पान कोरे ठेवलं असेल.</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> (हो हो Wifi त्रिजेच्या बाहेर एवढ एकच खरं कारण .. बिझी वगैरे काही नसतं कोणी!) हं तर काय सांगत होतो. जर त्यांनी</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> काही लिहिलं नसेल तर मार्क बिचारा आपल्याच जुन्या जुन्या आठवणी आपल्याला नव्याने दाखवत असतो, अमुक वेळी</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> तुम्ही काय करत होता, कुठे खात होता, कसे दिसत होता, वगैरे वगैरे. मग एकेकाळचा आपला आकार आणि चेहऱ्याची </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">सुबकता पाहून हरकून जायला होतं -- आणि हा आनंद कधी एकदा मित्राबरोबर वाटतो असं वाटायला लागत. ते काम पण </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">मार्क ने इतकं सोपं करून ठेवलंय ना हल्ल्ली कि विचारू नका.. मला तर ना कधीकधी त्याची मीठ मोहरीन दृष्टच</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> काढावीशी वाटते! मित्र मैत्रिणीचे फोटो पाहताना काहीजण वयाने आणि आकाराने वर्षानुवर्षे गोठलेले (frozen) दिसतात.</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> ती कदाचित एखादी जेनेटिक डिसऑर्डर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तरीही त्यांचे दिवसेंदिवस टवटवीत</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> होत जाणारे चेहरे, उजळ कांती आणि सडपातळ बांधा यावर टिकाटिप्पणी करणे अपरिहार्य ठरते! शिवाय ते फोमो </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">(Fear of missing out) का काय म्हणतात तेही असेना का बापडे!</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">शिवाय कधी कधी मला उलटही त्रास होतो. म्हणजे एखाद्या विषयावर इतक्या कल्पना सुचतात कि जणू आपण कल्पनेच्या </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">बागेत फिरत आहोत असे वाटते. मग आपण एक फुलपाखरू आहोत आणि सुचलेल्या कल्पना ही वेगवेगळी फुले आहेत </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">अशी (आणखी एक) कल्पना सुचून त्यांचा रसास्वाद घेण्यात व तौलनिक अभ्यासात गुंतून गेल्याने यातली कोणती निवडावी,</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> हेच सुचत नाही. शिवाय मला ना कुठल्याही कल्पनेत डावे उजवे करता येत नाही. आईला कशी सगळी लेकरे प्रिय</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> असतात ना अगदी तसंच होतं . (बहुतांशी लेखक हीच उपमा का बरं देत असावेत हा माझा एक भाबडा प्रश्न!). पण </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">आजकाल कुठल्याच गोष्टीची सुरुवात न होणं व त्यावरून जवळच्या व्यक्तीकडून टोचून बोलणं फारच असह्य व्हायला </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> लागलं म्हणून मी पम्प्याला विचारायचं ठरवलं.. पम्प्या म्हणजे पंकज परांजपे - माझा शाळेपासूनचा मित्र. [</span><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">जे </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">अस्मादिकांच्या लेखाचे नियमित वाचक आहेत ते या माझ्या गुरूला लगेच ओळखतील. गेल्या वर्षी त्याचा सल्ला मी माझ्या </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"कल्पनाखोर" अवस्थेत घेतला होता हे देखील चाणाक्ष वाचकांना स्मरले असेल.]</span><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">(संदर्भ: </span><a href="https://lamalblog.blogspot.com/2018/08/blog-post.html" style="text-decoration: none;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: underline; vertical-align: baseline;">मी आणि माझी कल्पकता, लमाल, ऑगस्ट २०१८</span></a><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">).</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><br /></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">तर मी पम्प्याला त्याच्या घराजवळच्या इराण्याच्या हॉटेल मध्ये भेटलो. त्याच्या आवडीची भजी आणि मस्का पाव </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">ऑर्डर केली.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"हं बोल बाबू.. काय समस्या आहे?" भजी हिरव्या चटणीमध्ये बुडवत पम्प्या बोलता झाला.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"अरे मला ना सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही." मी म्हणालो.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"अरे त्यात काय .. कुठूनही कर.. " पहिले भजे पोटात गेल्याच्या तृप्ततेचा आनंद पम्प्याच्या तोंडावर दिसायला लागला.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"तेच सांगतोय ना - कुठून सुरुवात करावी कळत नाही" मी परत सांगितलं.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"अरे माझ्यापुढे काय लाजतोस? बिनधास्त सांग.. " पम्प्या दुसऱ्या भजीत मग्न.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">त्याचे निम्मे लक्ष भजीत असेच राहिले तर आमच्यातली हि "कम्युनिकेशन गॅप" तशीच राहील हे मला उमगलं. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> मी त्याचं दुसरं भजे संपवून होईपर्यंत शांत बसलो. प्लेट त्याच्यापासून एक हात त्रिजेच्या बाहेर ठेवली.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">दुसरे भजे गिळंकृत झाल्यावर पम्प्याने डोळे वर करून माझ्याकडं पाहिलं. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"अरे बोल ना .. काय नक्की प्रॉब्लेम आहे? काय न संकोचता सांग."</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"अरे पम्प्या तेच सांगतोय -- तू जरा भज्यातून लक्ष कमी कर आणि मग ऐक म्हणजे तुला कळेल. .. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">कुठल्याही गोष्टीची सुरुवात कुठून करावी ते मला कळत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे.. " मी एका दमात उत्तरलो. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">तो पर्यंत भजीची प्लेट परत त्रिजेच्या आत गेली होती.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"ओह ओके - सो धिस इस प्रॉब्लेम ऑफ द स्टार्टींग"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">हा पम्प्या मधेच असा इंग्लिशवर घसरतो ते तेवढं एक सोडलं तर त्याचे सल्ले तसे बरे असतात..</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"हं मग सांग आहे का काही उपाय यावर? "</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"एस, धिस इस अन इश्श्यु ऑफ </span><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 700; text-decoration: none; vertical-align: baseline;">सुरुसुत्रता</span><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">हा पम्प्या इंग्लिश वाक्यात असे मध्येच मराठी घुसडतो ते तेवढं मला आवडत नाही -- बाकी त्याचे सल्ले तसे बरे असतात.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"सुसूत्रता म्हणायचं आहे का तुला? " त्याला दुरुस्ती सुचवतं मी विचारलं.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"नाही -- सुरुसुत्रता -- सुरु करण्याची सुत्रता"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">हा पम्प्या चुकीचा शब्द वापरला तर ते मान्य करत नाही हे काही मला आवडत नाही .. बा.त्या.स.त. ब. अ. ...</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"बर मग?"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"बाबू कसं आहे ना -- ज्याची आपल्याला आवड आहे ते आपण लगेच करतो आणि जे आवडत नाही त्याची चालढकल.. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">धिस इस बेसिक ह्यूमन टेंडन्सी यू नो ज्याला ह्यातील समतोल साधता आला तो जिंकला "</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">हा पम्प्या लेका स्वतःला मोठा मानसशात्रज्ञ समजतो पण कॉलेज मध्ये त्याला सायकॉलॉजीच्या पेपरमध्ये ४३ मार्क </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">मिळाले होते हे मला माहितीय त्यामुळे त्याचे असे बोल मी फारसे मनाला लावून घेत नाही.. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">मला अजून काही नवीन ज्ञान प्राप्त झालं नव्हतं पण उगाचच पम्प्याला पांढरीशुभ्र दाढी फुटली आहे आणि आपण </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">त्याच्या पायाशी शिष्य म्हणून बसलो आहोत असे काहीतरी चित्र माझ्या अंतर्मनात चमकून गेले!</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"तुला आठवतं, मागच्यावर्षी तू कल्पना सुचत नाहीत म्हणून रडत आला होतास.. तेंव्हा मी तुला वडापाव खायला सांगितलं </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">तर त्याची सुरुवात तू लगेच केलीस. कारण ते तुझं आवडतं काम !" पम्प्याने बोलायला सुरुवात केली.. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">ह्यातलं एक क्रियाविशेषण सोडलं तर बाकी सगळं खरं होतं. पम्प्या कधी कधी अतिशोयक्ती करतो त्याकडे जरा दुर्लक्ष </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">करावं लागतं बा. त्या. स.. ..</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"पण ... " चहाचा घोट घेऊन पम्प्या पुढं बोलता झाला.. "तुला योगा करायला सांगितलं तर त्याची सुरुवात केलीस का लगेच </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">तू? बिकॉज दॅट इज युअर मोस्ट अनफेवरेट टास्क"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">पम्प्याची गाडी परत इंग्लिशवर घसरली म्हणजे पम्प्या फॉर्मात आला हे मी ओळखलं.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">आता योगाला मी उशिरा सुरुवात केली हे खरं होतं पण मी "डील" शोधत होतो (कि हि माझी पळवाट होती?) तेंव्हा </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">शीर्षासन करत असताना मुरगळेल्या मानेच्या आठवणीने मी परत शहारलो. </span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"आणि तुला माहितीये ना रामदासांनीच सांगितलंय 'काहीतरी केलं कि काहीतरी होतंय'".</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"काय?" मी उडालोच! म्हणजे स्वतःचे विचार प्रसिद्ध लोकांच्या तोंडी आहेत असे सांगायची पम्प्याची सवय मला नवीन</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> नव्हती पण एकदम तो रामदासस्वामीच नाव घेईल अशी मला कल्पना नव्हती!</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"काहीही काय रे.. रामदास स्वामी असं कसं म्हणतील?" मी विरोध दर्शवला.. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"तेच रे - केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे -- मी जरा पॅराफ्रेज केलं एवढंच"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">पम्प्याची हि पॅराफ्रेझची लॉन्ग जंप मला तरी झेपणारी नव्हती.. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"बर ते जाऊदे , मग तू मला यावर उपाय सांग ना.. " मी त्याची गाडी तत्त्वज्ञानाच्या रुळांवरून हलवायचा माफक</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> प्रयत्न केला.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"सो यू सी वूइ नीड टू अंडरस्टॅंड द बेसिक फर्स्ट. व्हाय आर वूई द वे वूई आर बिफोर वूई चेंज इट"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">माझा आधीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचं माझ्या लक्षात आलं.. मी शांत बसलो..</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"तर तू आधी तुझी व्हॅल्यू सिस्टिम तपासून काढ"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">आता पम्प्या भरकटत कुठल्या रुळावरून कुठल्या क्षेत्रात गेला होता हे मला अनाकलनीय होते..</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"मग जे टास्क आहे ना त्याचे छोटे छोटे भाग कर.. " मस्कापावचा तुकडा तोडत पम्प्याचे प्रवचन सुरु होते.</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"मग त्याचे प्रायॉरिटीझशन आणि सिक्वेन्सिंग कर" पावाला मस्का लावायचा "सिक्वेन्स" पूर्ण करत पम्प्या म्हणाला..</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"मग छोटी काम आधी कर आणि मोठी कर .. किंवा उलटे केलेस तरी चालेल.. ऑल डिपेन्डस ऑन यू !"</span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">काय? उलटे केले तरी -- म्हणजे कसेही केले तरी चालेल? </span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">"बट यू आर नॉट सॉलविंग माय प्रॉब्लेम " -- आपण पण इंग्लिशमध्ये ठासून काही बोललं कि पम्प्या लक्ष देऊन ऐकतो </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">असा माझा अनुभव होता..</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">पम्प्याने डोळे पूर्ण उघडून बघितलं.. हे तो विषयावर बोलायला खऱ्या अर्थाने जागृत झाल्याचं लक्षण!</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">त्यानं न बोलता खिशातून एक छोटी डायरी काढली त्यात गिचमिड अक्षरात काहीतरी लिहायला लागला. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">साधारण ५-७ मिनिटे तो काहीतरी खरडत होता.. नंतर त्यानं त्यातला तो कागद फाडून माझ्या हातात ठेवला. </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">“जा वत्सा -- तुझे कल्याण होवो” असा काहीसा भाव त्याच्या नजरेत होता आणि शेवटचे भजे तोंडात टाकून पम्प्या </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">“बाय” करता झाला. </span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">मी तो कागद वाचायला घेतला. वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 700; text-decoration: none; vertical-align: baseline;">सुरु वातीचे नियम.</span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">त्याने सुरु आणि वात यात एवढं अंतर ठेवलं होतं कि तो फुलवातीसारखा एखादा वातीचा प्रकार वाटावा! त्या खाली</span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;"> गिचमिड अक्षरात नियम लिहिले होते.. </span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div align="left" dir="ltr" style="margin-left: 0pt;">
<table style="border-collapse: collapse; border: none; table-layout: fixed; width: 468pt;"><colgroup><col></col></colgroup><tbody>
<tr style="height: 0pt;"><td style="border-bottom: solid #000000 1pt; border-left: solid #000000 1pt; border-right: solid #000000 1pt; border-top: solid #000000 1pt; overflow-wrap: break-word; overflow: hidden; padding: 5pt 5pt 5pt 5pt; vertical-align: top;"><div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">१. कुठूनही सुरुवात करा. आता हेच वाक्य प्रमाणादाखल पहा -- </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">उलट लिहिलं तरी त्याचा अर्थ तोच होतो कि नाही? </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">२. सतत काहीतरी करत राहा. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">३. कामात बदल हीच विश्रांती समजा. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">४. सुरुवात हे आपल्या डोक्यात असतं -- असं काही नसतंच! </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">किंवा प्रत्येक सुरुवात हि कशाचातरी अंत असते. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">उदाहरणार्थ: सकाळची सुरुवात हा झोपेचा अंत असतो. </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">५. काहीतरी करू | तेव्हाच आपण तरु । जिंकू किंवा मरू । काम करा सुरु ।। </span></span></div>
</td></tr>
</tbody></table>
</div>
<span style="color: white;"><br /></span>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">“आणखी काय देऊ साहेब?” - कंटाळलेल्या वेटरनं त्रासून विचारलं -- माझा चेहरा हसरा आहे की रडका आहे हे त्याला </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">नक्की कळलं नसणार.. </span></span></div>
<span style="color: white;"><br /></span>
<br />
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">“शेवटी काय कुठूनही सुरुवात करा म्हणजे झालं.” </span></span></div>
<div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;">
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">काहीतरी त्रिकालाबाधित सत्य गवसल्यासारख वाटत मी बाहेर पडलो.. पम्प्याला भेटलं की मला अनेकदा असंच होतं! </span></span><br />
<span style="color: white;"><span style="background-color: transparent; font-family: "arial"; font-size: 11pt; font-style: normal; font-variant: normal; font-weight: 400; text-decoration: none; vertical-align: baseline;">त्याची सुरुसुत्रतेची गुरुकिल्ली कितपत उपयोगी पडते लवकर कळेलच! </span></span></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-2788023473176720512019-07-16T13:01:00.001-07:002019-07-16T13:01:41.605-07:00Don't name that thing!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
Today I was having lunch in cafeteria at work and was facing the glass panel. As I looked outside, I saw some people coming towards the cafe, green grass and some trees. Then JK's questions came to my mind. Once JK had asked young kids 'Can you look at the tree without naming it?'.<br />
So I was trying to see if that it possible. But before that, what does it mean to look at a tree (or anything for that matter) without naming it? My interpretation is to make sure knowledge does not become the hindrance. And I found it very very hard. You see, as soon as you look at the tree, you first perceive it as a "tree" immediately you know it is "green", it has "branches" and its "bark is brown" and so on. So all this is accumulated knowledge. These thoughts come rushing to you so fast that it becomes almost impossible to look at the tree without naming it.<br />
<br />
Taken in a slightly different context, I gathered that looking at a thing without naming it means to be aware of our deep conditioning and get rid of it. Consider you know someone who has betrayed you. The moment you come across that person, memory acts faster than thought and you automatically hate that person. Memory has conditioned you so deeply that you don't even realize it! So in essence what JK is saying is that can you stop that process? Can you avoid reliance on the memory?<br />
<br />
Seen another way, this is a form of meditation. Getting rid of memory, thoughts and still be aware of your surroundings. Of course, it is easier said than done!</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-51856351570717966812019-07-15T20:46:00.001-07:002019-07-15T20:46:09.026-07:00चष्मा काढा आणि मग बघा ... <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सहज सुचलेलं... </div>
<br />
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
गुरुपौर्णिमा म्हणलं की आपल्याला सगळे शाळेतले, कॉलेजमधले
शिक्षक आठवतात. आई हि मुलाची पहिली गुरु असते असं आपण म्हणतो. प्रार्थनेत
सुद्धा 'मातृदेवो भव' पहिल्यांदा येत. ते खरं आहेच पण आणखी एक गुरु
आपल्याला आयुष्यभर मिळतो तो आपण विसरतो. तो म्हणजे आपली बायको (किंवा
नवरा). </div>
<div>
आता नवरा बायकोच नातं म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच आणि भांड लागलं कि आवाज येणार हा निसर्गनियमचं,
नाही का? पण मग ह्या होणाऱ्या नैमित्तिक (?) वादातून/मतभेदातून असेल,
किंवा प्रासंगिक होणाऱ्या चिडचिडीतून असेल. प्रत्येक प्रसंगातून बायको
(किंवा नवरा) आपल्याला काहीतरी शिकवत असते/असतो. तो एक प्रकारचा "फीडबॅक"
असतो. फक्त होतं काय कि आपण त्यावेळी तो फीडबॅक घेण्याच्या मनस्थितीत नसतो,
किंवा तो फीडबॅक हा "बायको" कडून आलाय (किंवा नवऱ्याकडून आलाय) म्हणून
सोयीस्कररीत्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपण त्याच्याकडे
उदात्ततेने, कुठलाही किल्मिष मनी न बाळगता बघतच नाही. अर्थात तसं बघणं
म्हणावं तेवढं सोपं नाही, कारण 'अतिपरिचयात अवज्ञेची बाधा अनेकदा या
नात्याला सहजगत्या झालेली असते. वयानुसार प्रत्येकाचा समजूतदारपणा,
वैचारिक परिपक्वता वाढतेच अस नाही. काही प्रमाणात स्वभावातील लवचिकता
जाऊन तो निबर बनलेला असतो. त्यामुळे आपला जीवन सवंगडी हा "सवंगडी" (मित्र)
आहे हेच आपण विसरतो आणि तो "संगीन" (तलवार) असल्यासारखं त्याच्याकडे बघतो!
बघा पटतंय का? तर हा नित्य आपल्याबरोबर असणारा गुरु आपण गृहीत न धरता
त्याच्याकडून (तिच्याकडून) शिकणं शक्य आहे. फक्त त्यासाठी एखाद्या बायकोने
(किंवा नवऱ्याने) तिच्या नवऱ्याला (किंवा बायकोला) काही सल्ला दिला तर तो
आपल्या दोघांच्या हिताचा आहे हे कळण्यासाठी नवऱ्याने (किंवा बायकोने) हा
सल्ला आपल्या बायकोने (किंवा नवऱ्याने) दिला आहे हा चष्मा काढून त्याकडे
बघावे लागते. तरच तो सल्ला मोकळ्या मनाने घेता येतो. </div>
<div>
<br /></div>
<div>
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करा जरा विचार आणि हो, मनापासून पटलं, तर कृती देखील. फक्त हा नात्याचा चष्मा काढून पाहायला शिका! </div>
<div>
<br /></div>
<div>
(c) सागर साबडे </div>
<div>
<br /></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-77018583848479877612019-06-01T06:48:00.001-07:002019-06-01T06:48:19.815-07:00वळण<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
भले बुरे जे...घडुन गेले...<br />विसरुनी जाऊ... सारे क्षणभर...<br />जरा विसावु...या वळणावर...<br />या वळणावर....!<br /><br />लहान
पणी केंव्हा तरी... नववी दहावी ला असतांना परीक्षा सम्पल्यावर... सुट्टीचं
सकाळी झोपेत.... बाहेर की घरात... रेडिओवर...भले बुरे जे घडून गेले...
विसरुनी जाऊ सारे क्षणभर... हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं...!<br /><br />हळूहळू
ते गाणं कानात झिरपत होत नी पडुन रहावस वाटलं... ऐकत... अर्थ पुर्ण कडवे
सगळे...सुरेख चाल...! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं
गाणं...!<br /><br />खरंच आहे...आयुष्यात किती तरी वळणे येतात... कधी
संकटातुन.. वेदनेतुन...कधी आनंदात... हे वळणं येतातच येतात.. मग ते वळण
कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो... किंवा
कामाच्या ऑफिसच्या ठिकाणं च...! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं
सुद्धा... पुढचा प्रवास बदलणारा असतो... हेच वळण जे निर्विकार असतं.. एक
वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ...अवकाश...! भलं बुरं..
घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या
वळणावर...!<br /><br />खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं
आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप
दिल्यानंतर जस स्वच्छ उन्हं असतं ना अगदी तसं..!<br /><br />ह्याच वळणावर जरा
आयुष्य संथ झालेलं असतं... मनाला वाटतं की घडामोडिंना पूर्णविराम मिळालाय
पण वास्तव मध्ये तो स्वल्पविराम असतो...... जसं एक वाक्य संपत असतं नी
दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणु काही...!<br /><br />पान उलटणार असतं नि
माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते...! पुस्तक बंद करता
येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं
लागतं...! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही... अन हवी असलेली
मागची पानं परत वाचताही येत नाही...! ती आपोआप पालटत असतात...! वाचावीच
लागतात....! फक्त विसावा काय तेवढा आपला... बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन
आपण जीवन प्रवास करायचा...!<br /><br />हे सगळं लिहिताना आणखी एक सुचलेला
विचार. शाळेमध्ये तुम्ही कदाचित 'बँकिंग ऑफ रोड' बद्दल शिकला असाल. (
मूलभूत भौतिकशास्त्र व गणिताचा अभ्यास असल्यास जिज्ञासूंनी हा दुवा पाहावा,
http://www.chemistrylearning.com/banking-of-roads/) वळणावर गाडी उलटू
नये म्हणून बाहेरची बाजू जास्त उंच केलेली असते. तसेच जास्तीत जास्त किती
वेगाने वळण घेता येईल असे फलक रस्त्यावर तुम्ही कदाचित पहिले असतील..
आयुष्यातला प्रत्येक निर्णय हे एक वळण मानलं तर असं म्हणता येईल का की
एखादा निर्णय घेताना तुम्ही सर्व परिणामांची शक्याशक्यता विचारात घेतली
नसेल, किंवा घाईगडबडीत एखादा निर्णय घेतला असेल तर त्याचे पर्यवसान
आयुष्याच्या गाडीचा समतोल बिघडवण्यात होणार हे निश्चित. अर्थात तो कितपत
आणि त्यातून तुम्ही सावरू शकाल का हे सर्वस्वी व्यक्तिसापेक्ष आणि
परिस्थितीजन्य आणि त्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय आहेत त्यावर अवलंबून
असणार!<br /><br />अर्थात वळण (निर्णय) घेताना ते वळण कितपत धोक्याचे आणि
जीवनाच्या दृष्टीने मौलिक आहे हे माहित असेलच असे नाही. त्यामुळे निर्णय
घेताना एखादी चूक होतेय ते कळेलच असे नाही, कधी कधी भावनात्मक परिस्थिती
असल्याने निर्णय घेतले जात असतात. (emotions rule over logic) पण फळे
मात्र नंतर भोगावी लागतात.<br /><br />आयुष्यातील हि वळणे घेताना, एखादे वळण
हवेहवेसे व नकोसे वाटत असताना, एकाच गतीने उलगडणारा हा प्रवास जगताना
मनाच्या गाभाऱ्यात उमटणाऱ्या तरंगांना साक्षी ठेवून...<br /><br />वळणावळणाचे जीवन<br />जीवनातील वळणे वळणे<br />न कुणा कधीही कळली<br />न कुणा कधी कळणे<br /><br />वळण असे कधी काटेरी<br />असह्यपणे घेते चावा<br />कळू नये असा कधी<br />काळाचा हा गनिमीकावा<br /><br />वळण कधी ते गुलाबी<br />बेसावध मी येता जाता<br />गालावरचा तिच्या रक्तिमा<br />येई हसू आज आठवता<br /><br />वळण असे भारी अवखळ<br />येई मजला न सावरता<br />मला न रुचली अथवा पचली<br />दिधलिस त्याने जी चंचलता<br /><br />वळण भासे कधी<br />मज रेंगाळणारे<br />कुठली दिशा अन<br />कुठले वारे<br /><br />शेवटच्या त्या वळणावरती<br />ऐकू यावा मोहक पावा<br />अन माझ्या थकल्या जीवा<br />मनमुरारी कृष्ण दिसावा</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-9102831265195129402019-05-10T14:37:00.003-07:002019-05-10T14:37:58.985-07:00अंदमानच्या कोठडीत पु. ल.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="line-height: 1.5em;">
गेल्या शतकातील एक सत्यकथा<br />
प्रेम वैद्य<br />
<br />
(source: http://snchitnismiraj.blogspot.com/2012/02/blog-post.html)<br />
<br />
१५ ऑगस्ट१९८२ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही फिल्म्स डिव्हिजनचे काही
कर्मचारी ध्वजवन्दनाकरिता फिल्म भवनात जमलो होतो. कार्यक्रम संपन्न होताच,
दिल्लीला गेलेले आमचे एकसहकारी, श्री. प्रभाकर पेंढारकर तितक्यात तेथे
उपस्थित झाले आणि त्यांनी माहिती आणि मंत्री श्री. वसंत साठे यांचा तातडीचा
एक संदेश थापांना दिला – “सावरकर अनुबोधपटाचेचित्रीकरण लवकर सुरु करावे”.
थापांनी ते पत्र वाचून माझ्यापुढे करत म्हणाले “गेट बिझी इमिजिएटली.”१९७७
साली प्रारंभ झालेल्या या अनुबोधपटाचे कार्य १९८० साली गुंडाळण्यात आले
होते आणि एकदम १९८२ मध्ये त्याला एकाएकी पुनश्च्य सुवर्णमुहूर्त लाभला
होता.कुठेतरी वाचल्याचे आठवते, 'एखाद्या व्यक्तीचे तेजोमय भविष्य त्याच्या
मृत्यूनंतरही ओसंडून वाहत जाते आणि मनाला विलक्षण आनंदाचा आभास देते.' अशा
या उत्कंठित पार्श्वभूमीवर सावरकरअनुबोधपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात
झपाट्याने झाली. प्रथम स्वातंत्र्यवीरांचे जन्मगाव भगूर, नाशिक, पुणे,
रत्नागिरी, शिरगाव या क्रमाने चित्रीकरण करत आम्ही फेब्रुवारी १९८३
च्यादुस-या आठवड्यात अंदमानला पोचलो.प्रथमपासूनच स्वातंत्र्यवीर
सावरकरांबद्दल माझ्या मनात आदर असल्यामुळे, अंदमानात स्थायिक झालेले
सावरकरभक्त, सेवानिवृत्त जेलर श्री. गोविंदराव हर्षे यांच्या सहकार्याने
अंदमानचेकुविख्यात कारागृह आणि तेथील सावरकरांच्या कोठडीच्या चित्रीकरणाचे
कार्य जोरात सुरु झाले.शनिवार दि. २६ फेब्रुवारी १९८३ च्या सकाळी शूटिंग
चालू असतांना हर्षे म्हणाले, "आज सावरकरांची पुण्यतिथी. योगायोगाने विख्यात
साहित्यिक श्री. पु. ल. देशपांडे यांचे वास्तव्य इथे आहे.मी त्यांना आज
सायंकाळी इथे आमंत्रित केले आहे. अंदमान महाराष्ट्र मंडळाचे सर्व सदस्य आणि
इथल्या नौदलामध्ये काम करणारे सर्व महाराष्ट्रीयन लोक इथे येणार आहेत.
त्यामुळे आपण आपले शूटिंगदुपारनंतर बंद करुया.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
आत्मार्पणाच्या दिवशी पु. लं.ची अंदमानच्या कारागृहात उपस्थिती म्हणजे
आम्हा सगळ्यांना तो अति विलक्षण अनुभवाचा आणि आनंदाचा दिवस.सायंकाळी
कारागृहाच्या मुख्यद्वारी, अंदमान द्विपातल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी
पु. लं.चे स्वागत केले. ७२ वर्षांपूर्वी १९११ मध्ये स्वा. सावरकरांना बंदी
रुपात या तुरुंगात ज्या वाटेनेघेऊन जाण्यात आले असेल, कदाचित त्याच
पायवाटेने आज पु. ल. जात होते. कारागृहाच्या तिस-या मजल्यावरचे मोठे लोखंडी
दर अति भयाण आवाज करीत उघडण्यात आले.समोर दोन भिंतींच्यामधोमध असलेला एक
लांब पॅसेज थेट स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीपर्यंत जात होता. तो डोळ्यापुढे
येताच पु. ल. गहिवरून गेले.भावनेने ओथंबून जाऊन ते उदगारले "तात्यांना इथे
ठेवले होते?" त्यांचागळा भरून आला होता. पुढे त्यांना काही बोलताच
येईना.सतत हसतमुख असणा-या आणि इतरांना हसवणा-या पु. लं.चे हे असामान्य रूप
आम्ही पाहत होतो. हळहळत पुढे जात, पु. ल. त्या लोखंडी दारांच्या आंत,
'सावरकर कोठडीत शिरले. आमची गर्दीत्यांच्यामागेच, त्या १३ X ७ फुटांच्या
कोठडीसमोरच होती. आमच्यांतल्या काहींनाच आत शिरता आले. तिथे त्या काळोखांत,
भिंतीवर असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राला पु. लं.नीपुष्पहार
अर्पण केला आणि नतमस्तक होऊन आदराने नमस्कार केला. पुढे काही क्षण ते तसेच
स्तब्ध होते. अशा या हृदयस्पर्शी वातावरणाला तेजोमय करण्यासाठी आमच्या
गर्दीतल्या एकाने मोठयानेआरोळी ठोकली "वंदे मातरम"..."भारतमाताकी जय"..."
स्वातंत्र्यवीर सावरकरकी जय".... आणि आम्ही सर्वांनी त्याला दुजोरा
दिला.अशा आमच्या या घोषणांचा प्रतिध्वनी संपूर्णकारागृहाच्या आवारांत
घुमला. बहुतेक त्या कारागृहाच्या आयुष्यात प्रथमच अशा मुक्त, हौशी घोषणांचा
दिलखुलास वर्षाव झाला असेल.पु. ल. भारावून गेले.सावरकर कोठडीच्या समोर,
खाली अंगणात, जिथे ब्रिटीशांच्या काळांत कैद्याना फटके मारले जात, तिथेच
पु. लं.चे भावनेने ओथंबलेले, स्फुर्तीदायक, स्वातंत्र्यवीरांच्याआदरांजलीला
साजेल असे अविस्मरणीय साजेल असे अविस्मरणीय भाषण झाले. ते भाषण जसेच्या
तसे इथे देत आहोत -</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br />
</div>
<div style="line-height: 1.5em;">
मित्रहो,आजचा दिवस हा मी माझ्या
आयुष्यातला परम भाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नसल्यामुळे
मी त्याला पूर्वजन्माचा आधार देत नाही. पण माझ्या हातून कधीतरीकाहीतरी असं
घडलेलं असलं पाहिजे, की ज्यामुळे अशा प्रकारचा भाग्ययोग मला लाभला आहे.
सावरकरांच्या प्रतिमेला आत्ताच आपण पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा
उल्लेख नेहमी 'अंदमानातलीकोठडी' असा केला जातो. परंतु ज्या वेळेला एखाद्या
खोलीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येतं, त्यावेळेला त्या कोठडीचा गाभारा
होतो. आपण आत्ता जिथे गेलो तो असाच एक गाभारा झालेलाआहे. तिथे एक मूर्तिमंत
तेज वावरत होतं. 'तेजस्विना वधी तमस्तु' असं आपण नुसतं म्हणत असतो.
म्हंटलेलंही विसरून जात असतो. रोज म्हणत असतो.पण ख-या अर्थानं ज्यांची काय,
वाचा, मनसगळंच तेजस्वी, ओजस्वी होतं अशी भारतीय इतिहासातील व्यक्ती
शोधायची झाली तर प्रथम आपल्याला आधुनिक काळामध्ये वीर सावरकरांची आठवण
झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्येक क्षण हाजीवन उजळण्यासाठी आहे हे दाखवून
देणारं त्याचं उभं आयुष्य होतं. ते अंधाराचे सर्वात मोठे शत्रू होते. मग तो
अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा
पारतन्त्र्यासारख्यागोष्टींनी आपल्यावर लादलेला असो. अंधाराविरुद्ध त्यांनी
सदैव झुंज मांडलेली होती.मनुष्यजीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तींशी सतत
झुंज घ्यावी लागत असते. एक मनुष्य आणि निसर्ग, दुसरी मनुष्य आणि मनुष्य,
अंतत: तिसरी झुंज म्हणजे त्याची स्वत:शीच, स्वत:च्याआत्म्याशीच चालू असलेली
झुंज. प्रत्येकाच्या अंतर्गतच एक युद्ध चाललेलं असतं. त्याच अर्थानं
तुकारामांनी म्हटलंय, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'. कुठलंही युद्ध
म्हटलं की त्याचा पाहिलानियम असा आहे की युद्ध खेळणं-यानं 'मी जिंकणारच'
याच भावनेनं त्याच्यात जावं लागतं. सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे'
याचाच पुनःपुन्हा उद्घोष केलेला होता. पराजयाच्याभूमिकेतून गेलेला मनुष्य
कधी युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या विचारांचं सर काढायचं झालं
तर असं दिसेल की केवळ राजकीय गोष्टींवरच हल्ला करा असं त्यांनी सांगितलं
असं नाही,तर जिथे जिथे तुम्हाला अज्ञान दिसेल तिथे तिथे एखाद्या वीर
पुरुषासारखे तुटून पडा असं त्यांनी सांगितलं. म्हणून वैचारिक दृष्टीने
आधुनिक काळातल्या विज्ञानमहर्षींच्यामध्ये सावरकरांचं नावआपण अतिशय आदराने
घेतलं पाहिजे. विज्ञाननिष्ठा या विषयावरचे त्यांचे निबंध आपण वाचा, आणि
'विज्ञाननिष्ठा' का तर विज्ञान हे सतत अंधारावर मत करायला जात असतं म्हणून.
सर्वठिकाणचा काळोख प्रकाशमान करण्याची गरज असते. काळोख याचा अर्थ भय,
काळोख याचा अर्थ अंधश्रद्धा, काळोख याचा अर्थ आंधळेपण.सर्व ठिकाणचं अशा
प्रकारचं यासाठी त्यांनी नुसतीलेखणीच नाही, नुसती वणीच नाही, तर सगळं
शरीरकाया त्यासाठी झिजवली.२६ फेब्रुवारी हा त्यांच्या "आत्मार्पणाचा" दिवस
आहे असं आपण म्हणतो. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर 'जीवाना ध्वरि पडे आज
पूर्णाहुती' असा आपला हिशोबाच्या दृष्टीनं आज त्यांच्याआत्मार्पणाचा दिवस
असेलही. परंतू त्यांच्या वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून प्रत्येकच दिवस
हा त्यांच्यासाठी आत्मार्पणाचाच दिवस होता. "आत्मार्पण' हा विचार
त्यांच्या मनात आलानाही असा एकही दिवस नसेल. आपण मात्र पुष्कळसे लोक केवळ
मरता येत नाही म्हणून जगात असतो. आपल्या जगण्याला तसा श्वासोच्छवास घेणं
यापलिकडे फारसा अर्थ नसतो. पण जिथे जिथेलोकांना गुदमारलेपणा जाणवतो, जिथे
जिथे लोकांना मोकळे श्वास घेता येत नाहीत, त्या सर्वांचे श्वास मोकळे
करण्यासाठी मला श्वासोच्छवास घ्यायचाय या भूमिकेतून जेव्हा माणूस जगतो
तेव्हातो ख-या अर्थाने पारमार्थिक असतो. टिळे, माळा लावून 'जय जय रामकृष्ण
हरी' म्हणणारा पारमार्थिक आहे असं उगीचच आपण समाजात असतो. पण जीवनाचा
परम-अर्थ कळावा याच्यासाठीझगडणारा मनुष्य, निसर्ग-माणूस आणि आपण स्वत:, ही
सर्व कोडी उलगडण्याच्या मागे लागणारा मनुष्य हा पारमार्थिक म्हटला
पाहिजे.सावरकरांना या सेल्युलर जेलमध्ये प्रचंड शक्ती मिळाली. आज जरी आपण
तिथे नुसते जाऊन आलो तरी भयाण वाटतं. आपण कल्पना करू शकता की त्या काळी ते
असेच इथे उभे राहिले असतील. हे दृश्यपाहिल्यावर आपल्याला इथे ५० वर्षं
काढायचीत याखेरीज दुसरा विचार कदाचित त्यांच्यासमोर नसेल. ब्रिटीश सत्तेला
विरोध करणा-यांना, माणसासारख्या माणसांना मारणं हे ज्यांना लहानमुलांच्या
खेळासारखं वाटत होतं अशांच्यात एव्हढी वर्षं त्यांना काढायची होती. तरीही
मनात विश्वास बाळगायचा की या सगळ्या शृंखला गळून पडण्याचा एक दिवस येणार
आहे. मित्रानो,त्यांनी त्या वेळेला सांगून ठेवलं होतं की एक दिवस येथे आमचे
पुतळे उभे राहतील. हा काही अंधविश्वास नव्हता. त्यांना खात्रीच होती की ही
परिस्थिती आम्ही बदलू शकतो. हा विश्वासयेण्यासाठी त्यांनी विज्ञान
दृष्टीनं जगाकडे पाहिलं होतं. ज्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की
तुम्ही आम्ही अमृताचे पुत्र आहोत. एक दिवस मरण्यासाठीच जन्माला आलेले आहात
असंसांगणारा नव्हे, तर 'अमृताचे पुत्र' आहात असं सांगणारा हिंदू धर्मच
त्यांच्या डोळ्यापुढे असतो. घंटा वाजाव्यात तसे त्यांच्या मनाच्या
गाभा-यामध्ये हेच विचार वाजत होते. त्यांना एकमाहीत होतं की दुबळ्यांच्या
वाटेला दैव कधीही येत नाही. प्रत्येक बाबतीतल्या दुबळेपणाचा त्यांनी
धिक्कार केलेला आहे. सामोपचारानं आणि काहीतरी थातूरमातूर करून राजकारण
करणा-यामंडळींच्या बाबत त्यांनी 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, अस एक
शब्दप्रयोग केलेला आहे. आतलं शास्त्र काही कळलेलं नसताना जी नुसती
पोपटपंचीच असते असा 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, असं तेम्हणतात. प्रत्येक
गोष्ट बुद्धीच्या निकषावर पारखून जेव्हा एखादा माणूस घेत असतो तेव्हा
त्याच्या दृष्टीने पराजय नसतोच. मर्ढेकरांनीही आपल्या कवितेत म्हटलंय की
'भावनेला येऊ दे गाशास्त्रकाट्याची कसोटी.' नुसतंच एखादी गोष्ट पाहून
भावनाबंबाळ होण्याला काही अर्थ नाही. समजा हा सेल्युलर जेल पाहून मी
डोळ्यात अश्रू आणून थयथया नाचायला लागलो आणि मलाकिती दु:ख झालंय हे
सामान्यत: दोनशे माणसांना कळवणं म्हणजेच भावना असते असं नव्हे. उत्कृष्ट
भावना तीच असते की, जिला आवर घालून त्यापुढचं कार्य करण्यासाठी बुद्धीची
शक्ती मिळते.शास्त्रकाट्याची अशी कसोटी बुद्धीला लावणारे सावरकर
होते.अंदमान हे एका दृष्टीने तीर्थस्थानच झालेलं आहे. हे निराळ्या अर्थाचं
तीर्थस्थान आहे.सावरकरांच्या इतकी विज्ञाननिष्ठा असलेले लेख फार कमी
आपल्याला वाचायला मिळतात. खरं दुर्दैव हे आहेकी आपण वाचतच नाही. मी आता
काही तुमची परीक्षा घेणार नाही. पण इथे आलेल्यांना जर आपण विचारलं की
तुम्ही कितीसे सावरकर वाचलेत, तर वाचलेत म्हणणारी फार थोडी मंडळी असतील.इथे
याच जागी बसून, तुमच्यातच येऊन तुम्हाला नावं ठेवणं हे मला बरं वाटत नसलं,
तरी एकेकाळी मी मास्तर असल्यामुळे असे लोक जमलेले दिसले की तशी खुमखुमी
येते त्याला काय करणार! पण,सावरकर जितके तपशीलात, पुन्हा पुन्हा वाचत जाऊ,
तसं आपल्याला दिसतं की या माणसानं एखाद्या ज्योतिषासारखी भविष्यं केलेली
आहेत. आणि ज्योतिष्यासारखी, म्हणजे केवळ थातूरमातूरज्योतिषासारखी नव्हे तर
त्याचं गणित मांडून केलेली भविष्यं आहेत. ५० वर्षांच्या शिक्षेसाठी आत
जाणारा माणूस कशाच्या आधारावर म्हणत होता की, एक दिवस इथे आमचे पुतळे उभे
राहतील?त्यांना काळात होतं की माणसानं एकदा जिद्दीनं ठरवल्यानंतर कुणीही
त्याच्या आड येऊ शकत नाही. ते त्यांचं म्हणणं खरं झालं.आत्ताच श्री हर्षे
यांनी मला विनंती केली होती की सावरकरांच्याबद्दल व्यक्तिगत काहीतरी तुम्ही
बोला. तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत सुद्धा मला कधी
झाली नव्हती.सुर्याचं तेज नेहमी दुरूनच घ्यायचं असतं. त्याच्या फार जवळ
गेलं तर आपण भस्मसात होऊन जाऊ. आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या
पुस्तकांतून, त्यांच्या ग्रंथांतून. पण माझ्या आयुष्यांतआणखी एक सुवर्णयोग
आला होता. त्यांचा अमृतमहोत्सव झाला तेव्हा मी सावरकरांचं भाषण ऐकलं होतं.
आमच्या लहानपणी पार्ल्याला सावरकर बरेच वेळा येऊन गेले, तेव्हाही त्यांची
भाषणं ऐकलीहोती. 'गंगेसारखा ओघ' ही उपमा वक्तृत्वाला का देतात ते
सावरकरांचं भाषण ऐकल्यावर कळतं.सावरकरांनी किती त-हांची श्रीमंती आपल्याला
दिली आहे! भाषेवरून मला आठवतंय, सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण
वापरत असतो, ते आपल्याला माहीतही नसतं. सुरुवातीला जेव्हा तेआले, तेव्हा ते
कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली. परंतू ते सरकारी खात्याने
रूढ केलेले शब्द नव्हते, तर एका प्रतिभावंत कवीने रूढ केलेले शब्द होते.
या दोनात फरक असतो. 'मोलेघातले रडाया' म्हणून सरकारात भाषाशुद्धीचे लोक
बसवलेले असतात.इकडची डिक्शनरी घेऊन इकडे शब्द घाल, असं त्याचं चालू असतं.
पण हा प्रतिभासंपन्न कवी होता. 'रिपोर्टर'चं भाषांतरकरताना त्यांनी
'वार्ताहर' असं केलं.वार्तांचं, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून
नेणारा, तो वार्ताहर...... इथे प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते. आज
महाराष्ट्रात किंवा अगदीपुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी सुद्धा 'मेयर'
याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो. संपादक आणि
वृत्तपत्रातले बाकीचे पदाधिकारी , त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ
शब्दसावरकरांनीच दिलेत. चित्रपट सृष्टीतल्या लोकांचे तर सगळे शब्द सावरकरच
देत आहेत. दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिला., संकलक हा शब्द त्यांनी दिला.
अशा त-हेने त्यांनी मराठी भाषासमृद्ध केलेली आहे. आजही जर मुलांना ओघवती
भाषा शिकवायची असेल, त्यांचं बोलणं जास्त चांगलं व्हावं असं वाटत असेल तर
त्यांच्याकडून सावरकरांचे निबंध रोज मोठयाने वाचून घ्यावेत. म्हणजेवैचारिक
दृष्ट्याही तो मुलगा मोठं होईल आणि भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीनेही तो
मुलगा मोठं होईल.त्यांच्या लेखनात विलक्षण नाट्यमयता दिसून येते.
सावरकरांचे मराठी भाषेवर किती थोर उपकार आहेत हे अनेकांच्या कदाचित लक्षात
सुद्धा येणार नाही. सावरकर हे साक्षात महाकवीच होते.शतजन्म शोधिताना
शातअर्ती व्यर्थ झाल्याशतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या.इतकी
विराटकल्पना या 'स्पेस एज' च्या युगातसुद्धा आधुनिक कवींपैकी कुणी केल्याचं
मला आठवत नाही. आमचं प्रेम कसं होतं, त्याचं वर्णन करताना त्यांनी या ओळी
लिहिलेल्या आहेत. नुसती एकसूर्यमालिका आपल्या आवाक्यांत येत नाही, इथे हा
महाकवी म्हणतोय - 'शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या'; एव्हढं पाहणा-या
या महाकवीनं ब्रिटिशांच्या जेलमध्ये जन्मठेपेचा एक कैदीम्हणून इथे आल्यावर
काय हाल सोसले ते आपण 'माझी जन्मठेप' मध्ये वाचलेलच आहे. पण माझी खात्री
आहे की त्यांनी जेवढे हाल खरोखरच सोसले असतील त्याच्या एक दशांश सुद्धा
त्याच्यामध्येलिहिले नसतील. कारण त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल
जराशी सुद्धा करुणेची भावना उत्पन्न होईल असं त्यांना संशय आला असता, तरी
त्या महापुरुषाला ते आवडलं नसतं. मला नेहमी वाटतंकी झालेले सगळे हाल
त्यांनी त्यांच्यात लिहिलेलेच नाहीयेत. उगीच कुठल्या तरी म्हातारीने ते
वाचून 'अयाई, काय गं हे हाल' असं म्हटलेलं त्यांना नको होतं. उलट त्यांना
ते वाचून 'असे हालहोतात काय, ठीक आहे, मग मीही ते सोशीन' असं त्यातून
स्फूर्ती घेऊन हिंमतीने म्हणत पुढे येणारे तरुण हवे होते. त्यामुळे
स्वत:बद्दल कणव निर्माण करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केलानाही.
वार्धक्याच्या काळात ते कुणाला भेटत नसत. इथे बाळाराव आहेत, त्यांच्या अगदी
जवळ वावरलेले, त्यांना माहीत असेल नेमकं का ते. पण मला तरी असं वाटतं की
आपल्या आयुष्यात थकलेल्याअवस्थेत आपल्याला कुणी पाहणं त्यांना कधी आवडलेलं
नव्हतं. एखाद्या म्हाता-या सिंहालाही असंच वाटत असेल, की मला सर्कशीतला
सिंह म्हणून पाहू नका, तर जंगलात ज्यावेळेला मी डरकाळ्याफोडत होतो
त्यावेळेला हिंमत झाली असती तर माझ्यासमोर येऊन उभं राह्यचं होतंत. ह्याच
वृत्तीने जगल्यामुळे सावरकर त्यावेळी कुणाला भेटले नाहीत, तितकेच हसत हसत
ते मृत्यूला सामोरे गेलेलेआहेत.त्यांच्या विज्ञाननिष्ठेचं एकाच उदाहरण
आपल्याला सांगतो. आपल्याकडे बाकी सगळ्या बाबतीत आपण पुढारलेपणा दाखवू
शकतो.फक्त और्ध्वदेहिकाची जी काही पद्धत असते त्या बाबतीत आपण अगदीतर्कट
असतो. आपल्याला भीती वाटत असते की जिवंतपणी तर बाप मानगुटीवर कायम बसलेलाच
होता, आता न जाणो, मेल्यावरही बसायचा, म्हणून आपण ते सगळं करत असतो. ज्या
सावरकरांनाआपण धार्मिक, धर्मवादी, हिंदुत्वनिष्ठ......वगैरे वगैरे म्हणत
दूषणं लावल्यासारखे बनवत होतो, ते सावरकर आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवतात
की, 'मी मेल्यानंतर माझे शव विद्युतदाहिनीमध्येझोकून द्यावे'. ते 'झोकून
द्या' हा शब्द वापरतात. म्हणजे चक्क फेकून द्या. त्याला आता काहीही अर्थ
राहिलेला नाही, असं त्यांना म्हणायचय. हे शंकराचार्यांसारखंच आहे.
आद्यशंकराचार्यांच्या आईला उचलायला इतर ब्राम्हण येईनात. या छोट्या
मुलाच्यानंही ते जड शव उचलवत नव्हतं. त्यावेळेला ते म्हणाले, 'हे तर
काष्ठवतच झालेलं आहे'. - आणि म्हणून त्यांनी त्याचेतीन तुकडे केले, मग
वाहून नेऊन त्यांनी त्याचं पुढे काय ते दहन केलं. विज्ञाननिष्ठेची हीच
परंपरा सावरकरांनी दाखवली आहे. नाहीतर दुसरीकडे स्वत:ला 'सेक्युलर'
म्हणवणारे पुष्कळ जण आपणमेल्यानंतर गंगेत काय करा, यमुनेत काय करा, आणखी
कुठे काय करा वगैरे सगळं लिहीत बसलेले असतात. यांना मात्र आम्ही सेक्युलर
समजतो. असला सगळा तमाशा आपण नंतर करत असतो.ठाण्यातून एकदा मी मोटारीने जात
होतो..... खरं तर आजच्या अशा प्रसंगी विनोदी किस्सा सांगू नये. पण तुम्ही
मला बोलावलंय, तेव्हा मी माझ्या जातीवर जाणारच. राहवत नाही म्हणूनसांगतो. -
ठाण्यात त्या दिवशी जात असतांना पोलिसांनी माझी गाडी एकदा इकडे अडवली,
एकदा तिकडे अडवली, एकदा तिकडे अडवली. मला काही कळेना का ते. मी विचारलं काय
आहे होहे? तर ते म्हणाले, उद्या या रस्त्यानं एका पुढा-याची रक्षा नेणार
आहेत, त्याची ही रिहर्सल चाललीय. म्हटलं, मग रिहर्सलसाठी कुणाची रक्षा
वापरताय? आडमार्गानं सुद्धा असं नकरणा-या सावरकरांची थोरवी आपल्याला अनेकदा
कळतच नाही. 'विद्युतदाहिनी' हा शब्दसुद्धा सावरकरांचाच आहे. तोच आता रूढ
झालेला आहे. त्याच्यात माझं शव फेकून द्या, असं ते म्हणतात.इतकंच नाही तर,
त्यानंतर सुद्धा 'याचं स्वर्गात भलं व्हावं' या अर्थाचे मंत्र कुणी म्हणू
नयेत असंही ते सांगतात. ज्यांना कुणाला आपल्या मनाच्या समाधानासाठी काही
गुणगुणावासं वाटेलत्यांनी हवं तर काही गुणगुणावं. पण माझं नंतरचं
क्रियाकर्म कुणीही करू नये असं म्हणणारा अत्यंत 'रॅशनल' अशा प्रकारचा हा
मनुष्य होता. अशा माणसाच्या बाबत अर्थीविपर्यास असंहीपुष्कळदा घडत असतं.
सावरकरांनी गाय ही फक्त एक उपयुक्त पशू आहे, असं म्हंटल्यावर 'गायीच्या
पोटांत एकतीस कोटी देव आहेत' असं म्हणणारे लोक त्यांच्यावर केवढे भडकले
होते! त्यालासुद्धासावरकरांनी जे म्हंटलं, त्यानंतरचे सगळे अर्धवट वाचून
त्यांच्यावर केलेले आरोप होते. ते जगातल्या कुठल्याही प्रकारच्या
पावित्र्याला मान्यता देत नव्हते असं नव्हे. तर त्यांच्या दृष्टीने
सगळ्यादेशाचंच पावित्र्य महत्वाचं होतं. अहो, ज्या पुढा-यानं देव आणि धर्म
यापेक्षा देश हीच संकल्पना सगळ्यांत मोठी मानली त्यांच्यापेक्षा दुसरा
कुठला मोठा रॅशनल विचारच आधुनिक युगांत असूशकत नाही. त्यांचे
विज्ञाननिष्ठेचे विचारच आपल्याला इथून पुढल्या जगात लागणार आहेत. त्याचं
कारण; आपल्याला यापुढे क्षणाक्षणाला विज्ञानयुगातच जगायचं आहे. त्याच्याशी
जुळणारे जर आपलेविचार नसतील तर चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत असून सुद्धा
आपण आजच्या आदीम जमातींच्या प्रमाणेच कुठेतरी फेकून दिले गेलेले, बावळट
ठरू. अशा प्रकारच्या बावळटपणाचा सावरकरांना सदोदिततिटकाराच असे. त्यांना
दीन, दुबळा, वाकलेला, लाचार मनुष्य सहनच होत नसे. हे कितीतरी वेळा
त्यांच्या लिखाणात, त्यांच्या नाटकांत दिसून आलेलं आहे. 'तू तेजाचा पुत्र
आहेस' हा संदेश सतततुम्हाला त्यात सापडेल. त्या स्वाभिमानाचा नुसत्या
उर्मटपणाशी संबंध त्यांना जोडायला नको होता. ज्याप्रमाणे लिंकनने म्हटलंय
की, as I shall not be a slave, so I shall notbe a master, ज्याप्रमाणे मी
कुणाचा गुलाम होणार नाही, त्याप्रमाणे कुणाचा मालकही होणार नाही.
'जन्मठेपे'च्या सुरुवातीलाच असलेलं कदाचित आपण वाचलेलं असेल - त्या
काळातहीत्यांच्या डोळ्यासमोर कल्पना होती की सगळ्या जगाचं राष्ट्र एक
व्हावं. इतकी विराट कल्पना घेऊन बसलेल्या माणसाला ब्रिटीशांचा साम्राज्यवाद
किंवा आपल्या लोकांचा बावळटपणा सहनकसा होणार? आपल्या जीवनातल्या प्रत्येक
क्षणी ते य सगळ्याच्या विरुद्ध उभे राहिले. नुसते उभे राहिले असे नाही, तर
एखाद्या समिधेसारखा आपला देह त्यांनी त्यासाठी झिजवला. तीकृतकृत्यता
त्यांच्या 'जीवना ध्वरि पडे आज पूर्णाहुती' या शब्दातून
दिसते.सावरकरांच्यासारखी माणसं जीवनाचा कधी निरोप घेत नसतात. ती अमर असतात.
मृत्युन्जयच असतात. त्याचं एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादी ओळ सुद्धा
आपल्याला त्यांची आठवण करूनदिल्यावाचून राहात नाही. माझ्या मते 'क्षण तो
क्षणात गेलं, सखी हातचा सुटोनि' ही इतक्या श्रेष्ठ दर्जाची कविकल्पना आहे,
की त्या एका ओळीकरता त्यांना नोबेल पुरस्कार द्यायलापाहिजे होता. त्यांच्या
अशा एकेका निर्मितीमुळे ते चिरंजीव राहिलेले आहेत. आपण एवढंच बघायचं की,
या प्रकाशातला एखादा तरी किरण आपल्या अंत:करणात पेटतो की नाही. आज
त्यागाभा-यात पुष्पहार अर्पण करताना ज्याप्रकारे भरून आलं, ती भावना आपल्या
मनात राहिली तर क्षूद्र गोष्टींनी आपण जे विचलित होऊन जातो, तिथे तरी आपण
थोडे निर्भय होऊ शकलो तरबरं होईल. अशा निर्भयतेची उपासना करणं हेच तर
आपल्या भारतीय संस्कृतीचं पहिल्यापासून स्तोत्र राहिलेलं आहे. असं
निर्भयातला निर्भय माणूस इथे जेलमध्ये हालअपेष्टा सोसत कुणासाठीराहिला?
तुमच्या-माझ्यासाठीच राहिला नं? आज आपण मोकळेपणानं ज्या प्रकारे सहज म्हणून
इथे येऊ शकतो आहोत ते सावरकरांच्या आणि त्यांच्यासारख्यांच्याच
पुण्याईमुळे. त्या पुण्याईचं स्मरणआपण करतो म्हणून ती पुण्यतिथी असते.
माणूस नुसतं मेला तर त्याचं दरवर्षीचं श्राद्ध म्हणजे पुण्यतिथी होत नाही.
त्याच्या पुण्याचा जर काही वाटा आपल्यासमोर आलेला असेल तर ती
पुण्यतिथीअसते. सावरकरांच्याकडून आपल्याला स्वातंत्र्याचा, निर्भयतेचा वाटा
आलेला आहे. स्वातंत्र्याच्या उपासनेबद्दल बोलायचं तर मी आत्तापर्यंत
वाचलेल्या साहित्यातलं सर्वात सुंदर स्तोत्र म्हणजे -</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br />
</div>
<div style="line-height: 1.5em;">
'जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे........'याच्याइतकं सुंदर स्तोत्र नाही.</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br />
</div>
<div style="line-height: 1.5em;">
माझ्या आयुष्यात अंगावर काटा उभं
रहावा असं आणखी एक प्रसंग आला. सावरकरांनी ज्या अस्पृश्यांसाठी इतकी प्रचंड
धडपड केली त्याच बांधवांच्याशी संबंधित एका कार्यक्रमात मी गेलो
होतो.सावरकरांनी अस्पृश्यांसाठी केलेलं काम आपल्याला माहीत असेलच -
स्नेहभोजनं, मेळावे, पतितपावन मंदिर... असं मोठं काम त्यांनी मुख्यत:
रत्नागिरीतून केलं होतं. त्या बांधवांचं काहीतरी चांगलंव्हावं, ते मोठे
व्हावेत, शिकावेत, त्यांच्यातला भेद नाहीसा व्हावा यासाठी त्यांनी खूप धडपड
केली. सांगलीजवळ म्हैसाळ नावाचं एक गाव आहे. तिथे आमचे एक मित्र मधुकरराव
देवल यांनी ५०हरिजन कुटुंबांचा सहकारी शेतीचा एक प्रयोग उभं केलेला आहे.
ज्या दलितांच्या घरातल्या बायका गरिबीमुळे, एकच फाटकं वस्त्र असल्यामुळे
एकेकाळी घरातून बाहेर सुद्धा येत नसत, त्याचकुटुंबामधल्या बायका त्या दिवशी
त्या कार्यक्रमात जरीचे कपडे घालून आलेल्या होत्या. इतकी त्यांची त्या
शेतीतून प्रगती झालेली होती. सभेला सुरुवात झाली. ते म्हणाले, या बायका
आतागाणं म्हणणार आहेत. आजकाल गाणं म्हटलं की कुठलं तरी चित्रपटातलं गाणं
असणार आणि मुळात जितकं भीषण गायलेलं असेल त्यापेक्षाही भीषण ऐकायला मिळणार,
अशा अपेक्षेत होतो. म्हटलं,म्हणा. एकेकाळी घराबाहेर न पडणा-या आणि पडल्याच
तर ज्यांची छी: थू होत होती अशा बायकांनी माझ्यासमोर गाणं कुठलं म्हटलं तर
-</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br />
</div>
<div style="line-height: 1.5em;">
जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदेस्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br />
</div>
<div style="line-height: 1.5em;">
माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
मनात आलं, हे गाणं ऐकायला माझे कान उपयोगाचे नाहीत, इथे साक्षात सावरकरच
उपस्थित असायला हवे होते. म्हणजे त्याचं पुण्य कुठल्या काळात,
कुठल्याठिकाणी आणि कसं फळाला आलेलं आहे हे त्यांना पहायला मिळालं असतं.
त्याचा एक क्षण जरी जरी त्यांच्या अनुभवाला आला असता तर चांगलं झालं असतं.
त्याचं बीज असंही रुजलेलं आहे, त्यामुळेमारून, मरून किंवा विरुद्ध प्रचार
करून ही माणसं कधी मरणारी नाहीतच. स्वयंभूपणानं ही वटवृक्षासारखी जगात
असतात.जे तीर्थक्षेत्र झालेलं आहे अशा ठिकाणी, अंदमानात आपण जमलेलो आहोत.
तीर्थाची माझी अगदी साधी व्याख्या आहे. जिथे नुसत्या शरीराला स्नान घडतं
त्याला आपण पाणी असं म्हणतो, पणमनाला ज्याच्यामुळे स्नान घडतं ते तीर्थ
असतं. गंगेमध्ये शरीरही धुण्याची ताकद आहे आणि मनही धुण्याची ताकद आहे.
म्हणून गंगा हे तीर्थ होतं. अशाच एका तीर्थस्थळी आपण जमलो आहोत.खरं म्हणजे
प्रत्येक भारतीयानं इथे नतमस्तक व्हावं इतकं महान कार्य इथे घडलेलं आहे.
सर्वच भारतीय भाषांमध्ये सावरकरांच्या विचारांची भाषांतरं कशी करता येतील,
याचाही कार्यक्रम आपणहाती घेतला पाहिजे असं मी बाळाराव सावरकरांना म्हटलंच
आहे. बाळारावानीही याचं कार्यासाठी आयुष्य वाहिलेलं आहे. त्यांना या
कार्याला समर्थता लाभावी म्हणून आपल्यासारखी मंडळीत्यांच्याबरोबर
आल्याशिवाय राहणार नाहीत, असा मला विश्वास वाटतो. इथल्या पुण्याईला
मन:पूर्वक अभिवादन करून मी थांबतो.</div>
<div style="line-height: 1.5em;">
<br />
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-33176287390249417342019-04-09T14:31:00.003-07:002019-04-09T14:31:54.419-07:00Selfie<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
पूर्वी मोबाईल फोन ला फक्त मागे कॅमेरा असे. फोनला पुढच्या बाजूला
कंमेरे आले व सेल्फीच युग सुरु झालं. पूर्वी ग्रूपचा फोटो काढण्याच्या
निमित्ताने का होईना कुणाला तरी विचारावं लागायचं, एक दोन वाक्य बोलली
जायची. त्या संवादाला फार काही अर्थ होता अशातला भाग नाही. पण त्यामुळे का
होईना माणूस दुसऱ्या अपरिचित माणसाशी संवाद साधत होता. कधीकधी "अरे आपण
एका गावचे" असा शोध लागून तो वाढत असे नि मैत्रीच्या नवीन तारा जुळत असत.
आता हा असा होणारा संवाद हळू हळू कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सेल्फीसाठी नजर स्वतःकडे वळली स्वतःचे बाह्यरूप न्याहाळण्यात, त्यावर
भाळण्यात कदाचित थोडं नार्सिसिस्टपणाकडे वळली.. पण यातून स्वत:शी संवाद
मात्र सुरु झाला नाही हेही तितकंच खरं ! बघा पटतंय का.. </div>
<div>
<br /></div>
<div>
(सहज सुचलेले विचार.. ९ एप्रिल २०१९)</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-89190118073484644122019-02-19T10:02:00.002-08:002019-02-19T10:02:59.203-08:00Mukti - inspired by J Krishnamurti's writing<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
मुक्तीचा ध्यास </div>
<div>
<br /></div>
<div>
- सागर साबडे </div>
<div>
<br /></div>
<div>
आपण एक छोटा प्रयोग करूया.. खालील वाक्ये वाचा. प्रत्येक वाक्यानंतर तुमच्या विचारांचे निरीक्षण करा. </div>
<div>
<br /></div>
<div>
१. कोर्टानं आज निकाल दिला. जेम्सला जन्मठेप झाली. </div>
<div>
२. जेम्सला २ लहान मुलं आहेत -- एक पाच वर्षाचा आणि एक २ वर्षांचा. </div>
<div>
३. जॅम्सची बायको ६ महिन्यापूर्वीच एका अपघातात गेली. </div>
<div>
४. त्या अपघाताला जेम्स जबाबदार होता असं कोर्टात सिद्ध करण्यात आलं. </div>
<div>
५. जेम्स गाडी घरी दुरुस्त करायला घेतली आणि एका चाकाचे बोल्ट्स पूर्ण घट्ट केले नाहीत. </div>
<div>
६. गाडी पूर्ण दुरुस्त झाली नाही असं जॅम्सन एका चिट्ठीवर लिहून ती गाडीला लावली होती. </div>
<div>
<br /></div>
<div>
आता
आपण तुमच्या विचाराकडे पाहू. तुम्ही निरीक्षण केलं का? तुमच्या
विचाराच्या लहरी कशा बदलत होत्या? पहिल्या ३ वाक्यांनी कदाचित तुम्हाला
जेम्स बद्दल सहानुभूती वाटली असेल. नंतरच्या २ वाक्याने कदाचित ती कमी झाली
असेल. शेवटच्या वाक्याने कदाचित ती परत वाढली असेल.. हे असं का होतं?
अर्थात आपल्या मनाचं झालेलं संस्करण (conditioning). </div>
<div>
हजारो
वर्षांपासून ज्यांना आपण परंपरा म्हणून अंगीकारत आलो आहोत, भाबडया
आंधळेपणाने जोपसतो आहोत आणि त्यांनी समाजमनावर एकप्रकारचे गारुड तयार केले
आहे. इतके की ते जोखड आहे ह्याची आपल्याला कणसुद्धा जाणीव नाही आणि ती
जाणीव कुणी करून दिली तर त्याला गद्दार ठरवून समाजातून उठवायला आपण तयार
आहोत. वर संस्कृतीरक्षण कसे केले याच्या टिमक्या वाजवायला मोकळे! </div>
<div>
<br /></div>
<div>
तर
हे जे आपलं झालेलं conditioning आहे त्यापासून मुक्ती शक्य आहे का? ह्यावर
आपण विचार करत आहोत. जर हे कंडिशनिंग चे लिंपण काढायचा तुम्ही जाणूनबुजून
प्रयत्न केला तर ते अधिकच खोल होईल. पण ती अभिलाषा नष्ट करण्याऐवजी जर
तिचा उगम शोधायचा प्रयत्न आपण केला तर तर त्या ज्ञानाच्या शोधात आपल्याला
इच्छेचा उगम कदाचित सापडेल. आणि ह्या ज्ञानातच कंडिशनिंग पासूनची मुक्ती
सामावली आहे. तर हि मुक्ती म्हणजे थेट परिणाम नाही. मी जर एखादी गोष्ट
सोडायचा जाणूनबुजून प्रयत्न केला किंवा बंड केले तर त्यातून दुसरे
conditioning मी तयार करत असतो. म्हणजे मी एकातून मुक्ती मिळवतो आणि
दुसऱ्यात अडकतो. मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येतंय का? मी मनात
निर्माण होणाऱ्या इच्छेपासून मुक्ती मिळवायचा धडपडून प्रयत्न केला (आणि
ह्या इच्छेमध्ये मुक्त होण्याची इच्छापण आली) तर मी ह्या गुंत्यातच अडकून
बसेन. कारण हे circular reasoning सारखं होईल. तर हि इच्छेच्या उगमाची
स्थिती जाणून घेण्यासाठी मी जागरूकपणे प्रयत्न केले तर मला ह्या
conditioning पासून मुक्ती मिळेल आणि हा सर्वस्वी byproduct आहे. तर हि
मुक्ती मिळणं महत्वाचं नसून ज्यामुळे कंडिशनिंग होते आहे ते आपल्याला समजणे
महत्वाचे आहे.</div>
<div>
</div>
<div>
हे बघण्यासाठी आपल्याला
विचारांचा आधार घेऊन चालणार नाही. तुम्ही म्हणाल विचार नसतील तर सगळंच
खुंटलं. हे काही विचारानं सुटणार कोडं नाहीये. आपले विचार म्हणजे तरी काय
असतं हो? आपल्या स्मृतींचं (memory) एक जाणीवपूर्वक केलेलं संकलन आणि
चाकोरीबद्ध आचरण. तुम्ही विचारांशिवाय एखादी गोष्ट कधी पाहिली आहे का? कधी
विचारांशिवाय एखादी गोष्ट ऐकली आहे का? (एक क्षण विचार करा: हे वाचताना
तुम्ही तुमचे विचार बघा -- तुम्ही लगेच तुमच्या conditioning प्रमाणे - मग
त्यात तुमचे शिक्षण आले, संस्कार आले सगळं आलं -- हे मी सांगतोय त्याच्याशी
सहमत तरी होताय नाहीतर हे चूक आहे असं एक defensive कवच करायला जाताय. )
तर कुठलीही प्रतिक्रिया न दर्शविता, नव्हे कुठलीही प्रतिक्रिया मनात न आणता
तुम्ही एखादी गोष्ट बघायचा ऐकायचा प्रयत्न केलाय का? तुम्ही म्हणाल
सगळ्याच मनाचं conditioning झालेलं आहे. पण हे असे म्हणणे म्हणजे तुम्ही
स्वतःला विचारांनी बंदिस्त केले आहे. कारण असे मन असू शकेल ह्या शक्यतेचाच
तुम्ही अव्हेर करता आहात. </div>
<div>
<br /></div>
<div>
तर आपल्या मनाला
आपल्या conditioning ची जाणीव होणं शक्य आहे का? मला वाटतं ते तेंव्हाच
शक्य आहे जेंव्हा तुम्ही स्मृतीच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे जात. जे
जे आपल्याला ज्ञात आहे ते सर्व त्यागून मग काहीतरी ऐकता, पाहता. तुम्ही
हिंदू आहात, समाजवादी किंवा साम्राज्यवादी आहात, काळे किंवा गोरे आहात,
गरीब किंवा श्रीमंत आहात हे तुम्ही "चूक किंवा बरोबर" अश्या तराजूनं ना
तोलता, कुठल्या सापेक्षतेच्या चष्म्यातून न बघता समजून घेऊ शकता का? हे
इतके अवघड आहे ना की आपण म्हणतो अशक्यकोटीतीलच गोष्ट आहे. पण मला वाटते
जेंव्हा तुम्हाला स्वतःची पूर्णत्वाने जाणीव होते जेंव्हा तुम्ही स्वतःचे
कंडिशनिंग याहून सुद्धा कुठलीही प्रतिक्रिया न देता स्वतःचे प्रतिबिंब
लक्खपणे बघू शकता तेंव्हाच तुम्हाला स्वतःपासून मुक्ती मिळणे शक्य आहे. </div>
<div>
</div>
<div>
हि
मुक्ती तुमच्या "अहं" पासून आहे. तुम्हीच तुमच्याभॊवती उभारलेल्या
भिंतीपासून आहे. तुम्हीच तुमच्या मनात जोपासलेल्या भीतीपासून आहे. तुम्हीच
जपलेल्या दुःखापासून आहे आणि तुम्हीच मानलेल्या सुखापासून सुद्धा आहे. पण
हि मुक्ती म्हणजे सुख दुखापलीकडे जाणारा एक चिरंतन आनंद आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
===</div>
<div>
वर लिहिलेला एक प्रकारचा स्वैर अनुवाद आहे. मी कृष्णमूर्तींचे तत्वज्ञान वाचतो आणि त्यातून सुचलेले काही विचार मांडले आहेत. </div>
<div>
<br /></div>
<div>
The desire to free oneself from conditioning only furthers conditioning.
But if, instead of trying to suppress desire, one understands the whole
process of desire, in that very understanding there comes freedom from
conditioning. Freedom from conditioning is not a direct result. Do you
understand? If I set about deliberately to free myself from my
conditioning, that desire creates its own conditioning. I may destroy
one form of conditioning, but I am caught in another. Whereas, if there
is an understanding of desire itself, which includes the desire to be
free, then that very understanding destroys all conditioning. Freedom
from conditioning is a by product; it is not important. The important
thing is to understand what it is that creates conditioning.
</div>
<div>
<div class="m_7497790375967429341m_-2784500878711783828m_844953500251637806gmail-field m_7497790375967429341m_-2784500878711783828m_844953500251637806gmail-field--name-body m_7497790375967429341m_-2784500878711783828m_844953500251637806gmail-field--type-text-with-summary m_7497790375967429341m_-2784500878711783828m_844953500251637806gmail-field--label-hidden">
To free the mind from all conditioning, you must see the totality
of it without thought. This is not a conundrum; experiment with it and
you will see. Do you ever see anything without thought? Have you ever
listened, looked, without bringing in this whole process of reaction?
You will say that it is impossible to see without thought; you will say
no mind can be unconditioned. When you say that, you have already
blocked yourself by thought, for the fact is you do not know.<br />
So can I look, can the mind be aware of its conditioning? I think it
can. Please experiment. Can you be aware that you are a Hindu, a
Socialist, a Communist, this or that, just be aware without saying that
it is right or wrong? Because it is such a difficult task just to see,
we say it is impossible. I say it is only when you are aware of this
totality of your being without any reaction that the conditioning goes,
totally, deeply—which is really the freedom from the self.<br />
</div>
</div>
<div>
<br /></div>
<div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-23136916057863608732019-02-18T18:50:00.001-08:002019-02-18T18:50:57.708-08:00Karan - ek gosta<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
लमाल साठी लिखाण </div>
<div>
<br /></div>
<div>
धनुनं पुन्हा एकदा
बसच्या रस्त्याकडं पाहिलं. अजून बसचा पत्ता नव्हता. हातातल्या जुनाट
घडाळ्यात पुन्हा एकदा वेळ पाहिली. गेल्या २ मिनिटात वेळ बघायची हि तिची
तिसरी वेळ होती. घड्याळाचा काटा ढिम्म बसल्यागत वाटत होता. उन्हानं
अंगाची लाहीलाही होत होती.
मळक्या कपड्यातला एकजण तिच्या शेजारी येऊन थांबला.. तिनं चोरट्या नजरेनं
पाहिलं.. कधीकाळी पिवळसर असावा असा कळकट शर्ट, काळसर जाडीभरडी पॅन्ट --
एक पाय गायब -- दुसऱ्या पायावर सगळी भिस्त. जगाशी त्याला काही देणंघेणं
नव्हतं .. दोन्ही कुबडयांवर भार पेलत त्यानं विडी काढली व पेटवली. त्या
वासानं धनुला मळमळल्यागत झालं म्हणून ती थोडी बाजूला सरकली. </div>
<div>
बसथांब्याच्या
शेजारीच रघु वडे, भजी आणि लिंबू सरबत विकत होता. त्याच्या वासानं भूक
चाळवली जात होती. बसची वाट पाहूनकंटाळलेले काही लोकं आपसूकच तिकडं वळत
होते. त्यामुळे रघूचा धंदा चांगला चालला होता. </div>
<div>
<br /></div>
<div>
११:४५
वाजून गेले तरी ११ च्या बसचा पत्ता नव्हता. धनुच्या पोटात कावळे ओरडत
होते. सकाळी चहा बनपाव खाल्ला होता पण तेवढ्यानं काय होतंय. </div>
<div>
</div>
<div>
"वडापाव केवढ्याला?" तिन विचारलं. </div>
<div>
"८ रुपये" रघून गरम तेलात पुढचा घाणा सोडतं तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं. </div>
<div>
"आणि सरबत?"</div>
<div>
"५ रुपये ग्लास" - थोडंसं खेकसत तिच्याकडे बघत रघु ओरडला.तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या पोटाकडं गेलं. </div>
<div>
धनुच्या वाढलेल्या पोटाकडे बघितल्यावर मात्र तो ओशाळला. तिच्यावर असं ओरडायला नको होतं असं त्याला वाटून गेलं. </div>
<div>
"काय देऊ ताई?" शक्य तितक्या कोमल आवाजात त्यानं विचारलं. </div>
<div>
<br /></div>
<div>
हातातल्या १० रुपयाच्या नोटेकडं धनून पाहिलं. पाकिटात फारतर आणखी २/३ रुपये असतील. आता बसला ६ रुपये लागणार. </div>
<div>
सगळे
पैसे उगाच मनीऑर्डरनं घरी पाठवले असं तिला वाटलं. पण अप्पा आजारी आहेत
त्यांना गरज आहे ह्या विचाराने तिला जरा शरमल्यागत झालं. तिन मनाशीच विचार
केला.. "आता हे आजच काम झालं कि आणखी बक्कळ पैसा मिळेल -- राजू बोललाच
होता!". राजू कंत्राटावर जी काम द्यायचा त्यानुसार पैसेपण द्यायचा -
त्यामुळे त्याच्यावर तिचा दाट विश्वास होता. एकदा ते पैसे मिळाले की मग
सुट्टी घऊन अप्पाना भेटायला जायचं. धनून मनाशी पक्क केलं. </div>
<div>
<br /></div>
<div>
"नको काही" हातातली १० ची नोट आणखी घट्ट दाबत धनु म्हणाली. </div>
<div>
रघूला तिची कीव आली. </div>
<div>
"घ्या ताई. वडापाव खा.. पैसे राहू द्या" असं म्हणत त्यानं वडापाव तिच्या हातात कोंबला. </div>
<div>
<br /></div>
<div>
तीन
हात जोडले. वडापाव खायला सुरुवात केली तेवढ्यात गलका झाला. कुणालातरी
लांबून बस येताना दिसली. धनून वडापाव पिशवीत कोंबला. सोबतची थैली परत
खांद्यावर नीट घेतली आणि हाताचा आडोसा करून लांबून येणारी बस दिसते का पाहू
लागली. लांबून येणारा लाल ठिपका हळूहळू जवळ आला.
बस खचाखच भरली होती.
एकच गलका करून मधमाशीच्या पोळ्यासारखी सगळी गर्दी एकदम गाडीला झुंबली.
आतल्या लोकांना बाहेर यायला जागा मिळेना.. </div>
<div>
तेवढ्यात कंडक्टर ओरडला "पुढच्या दारातुन उतरा की भाऊ". </div>
<div>
"ओ ह्या ताईंना जाऊदे पुढं .. पोटुशी हायेत" कुणीतरी धनुला मागून ढकललं </div>
<div>
<br /></div>
<div>
कुणी
बसायला जागा देईल ह्या आशेने धनून हळूच पाहायला सुरुवात केली.. एकाशी
धनुची नजरानजर झाली. त्यानं लगेच नजर चुकवून हातातल्या पेपरमध्ये डोकं
खुपसल. </div>
<div>
पुढच्या सीटवर थोडी जागा आहे असं तिला वाटलं..
तेवढ्या कडेला बसलेल्या माणसानं मांडी थोडी ऐसपैस केली. थोडंसं हिरमुसून
धनु त्या गर्दीतून पुढं सरकली. </div>
<div>
<br /></div>
<div>
कशाला पोट
घेऊन गर्दीत शिरतात लोकं कुणास ठाऊक? कुणीतरी कुजकी टिप्पणी केली. धनून
तिकडं दुर्लक्ष केलं. आता एवढं काम कधी पूर्ण करते एवढ्यावरच तिचा लक्ष
केंद्रित होतं. </div>
<div>
लोकांच्या गर्दीतून वाट काढत कंडक्टरनं तिकीट विचारलं. १० ची नोट त्याच्या हातात कोंबत 'वडाळा द्या एक' असं ती म्हणाली. </div>
<div>
दिड
काढायला पाहिजे नाही? मघाचा कुजकट आवाज परत आला.. धनून तिरस्कारानं
आवाजाच्या दिशेला पाहिलं. दाढीचे खुंट वाढलेला एक इसम दात वेंगाडून हसत
होता.. धनु आणखी पुढं सरकली.. </div>
<div>
<br /></div>
<div>
'महिलांसाठी राखीव'' - डावीकडच्या सीटजवळ तीन वाचलं. खाली एक तुंदिलतनु बाई ढाराढूर झोपली होती. </div>
<div>
"पुढं चला.. चला पुढं" कंडक्टर मागून ओरडला.. </div>
<div>
काहीजण
पुढच्यावर रेलले काहीणांनी एक पाऊल पुढं केल्यागत केलं. तेवढ्यात
ड्रायव्हरनं कच्चकन ब्रेक दाबला.. धनु पुढ ढकलली गेली पण तोल न सावरता
आल्यानं एकदम कोसळली. एव्हाना ती बसच्या पुढच्या दारापर्यंत आली. उठणार
तेवढ्यात तिची नजर शेजारच्या सीटकड गेली. 'अपंगासाठी राखीव' - तो बसस्टॊप
वरचा अपंग माणूस तिथं बसला होता. सीटचा आधार घेऊन धनु उठली व खिडकीबाहेर
बघायला लागली. गरम वारेच्या नुसत्या झळा येत होत्या. . </div>
<div>
<br /></div>
<div>
'बसा ताई' तेवढ्यात आवाज आला. </div>
<div>
तो अपंग कुबड्या सावरत उभा राहिला होता आणि त्याच्या जागेवर बसायला सांगत होता. </div>
<div>
'नको, तुम्हीच बसा हो" - माणुसकीचा हा अनपेक्षित पैलू पाहताना एकीकडे सुखावत पण ओशाळत ती म्हणाली. </div>
<div>
"मला उतरायचंच आहे आता.. बसा तुम्ही ताई. " तो म्हणाला. </div>
<div>
धनु बसली.. "थँक यू" - कपाळावरचा घाम पुसत स्मितहास्य करत ती म्हणाली. हातातली जड पिशवी तिनं सीट खाली टाकली. </div>
<div>
तो
माणूस आणखी डावीकडे सरकला -- अगदी पुढच्या दरवाजात एका पायावर तोल सावरत
उभा राहिला. आधाराला एक हात त्यानं धनु बसली त्या खिडकीवर धरला. </div>
<div>
<br /></div>
<div>
धनून
मनाशी विचार केला.. एका बसचा प्रवास पण किती लोक आणि किती तऱ्हा पाहायला
मिळाल्या. तिरस्कार, कुजके/टोचून बोलणे, स्वार्थीपणा, आणि ज्याच्याकडून
अपेक्षा नाही त्याच्याकडून निस्वार्थी मदत! तिला वाटलं खरतर जग अशा
लोकांच्यावरच टिकून आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
ड्रायव्हर बेफाम निघाला होता. पुढचा रस्ता रिकामा दिसत होता. </div>
<div>
<br /></div>
<div>
डाव्या
हातात राग लागली असं वाटून धनून हात जोरात झटकला .. तो नेमका त्या खिडकीवर
तीन बोट धरून उभ्या असणाऱ्या माणसाला लागला - जोरात आवाज झाला आणि तोल
जाऊन तो बाहेर पडला.. </div>
<div>
"थांबवा थांबवा गाडी -- " कोणतरी
मागून ओरडलं पण वेगात असल्यानं ड्रायव्हरला ऐकू येई पर्यंत गाडी कित्येक
फर्लांग पुढं गेली होती. धनून खिडकीतून डोकावून पाहिलं. तो बिचारा
गुढग्यावर हात धरून पडला होता.. बसमध्ये त्याची अडकलेली कुबडी तिने खाली
फेकली.. </div>
<div>
<br /></div>
<div>
पण धनून असं का केलं? काय कारण असेल? </div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
----</div>
<div>
<br /></div>
<div>
बसचा
पूर्ण चक्काचूर झाला होता. अनेक देहांची शकले झाली होती. लागलेल्या
आगीमुळे एकच हाहाकार उडाला होता. पोलिसांनी नाकाबंदी केली. </div>
<div>
नाम्या
एकाजागी पडून बघत होता. थोड्या वेळापूर्वी बस मधून पडल्याने त्याला उठता
येत नव्हतं पण कदाचित तिनं धक्का दिला म्हणूनच तो जिवंत होता!</div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
</div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-24962072984819127242018-11-28T21:41:00.000-08:002018-12-06T14:31:41.086-08:00Punekar - Mumbaikar - Nagpurkar - ektra bhetale tar?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर एकत्र आले तर काय होईल ह्यावर कल्पनाविलास. पुलंची क्षमा मागून आणि त्यांच्याच प्रेरणेने !</div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
स्थळ:
पुण्यातील एक बस स्टॉप. जवळ एक माणूस (हा पुणेकर) पेपर विकतो आहे.
त्याच्याकडे सकाळ, महाराष्ट्र टाइम्स हि वर्तमानतपत्रे आहेत असे दिसते.
सोबत एक खास पुणेरी पाटी आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
"<b>वर्तमानपत्रे, शहाळे आणि दणकट पायजमे मिळतील. पत्ता सांगायचे २ रुपये.</b>"</div>
<div>
<br /></div>
<div>
एक
माणूस भरभर चालत येतो. त्याच्या चालीवरून तो मुंबईकर असावा असे कळते.
बस नुकतीच गेली असावी अशा पद्धतीने रस्त्याकडे बघतो. बसचा थांगपत्ता नाही.
म्हणून तो त्या पेपर विक्रेत्याकडे जातो.</div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर : काय बस गेली का हो इथून इतक्यात? </div>
<div>
पुणेकर: (त्रासिक स्वरात) मला काय माहिती? </div>
<div>
मुंबईकर: म्हणजे - what do you mean? तुम्ही इथे उभे आहात ना? इथून बस गेली का ते विचारतोय. that's all. </div>
<div>
पुणेकर : ते माझे काम नाही. तुम्हाला काय विकत घ्यायचं आहे का ते बोला.. </div>
<div>
मुंबईकर: काय माणूस आहे? सरळ बोलताच येत नाही पुणेकरांना .. साधा प्रश्न विचारला तरी तिरकस उत्तर.. </div>
<div>
पुणेकर : ओ साहेब .
तुम्ही इथले दिसत नाही..
. पुणेकरांना काय बोलला हो? असला अपमान इथे खपवून घेतला जाणार नाही .. आम्हाला पुण्याचा जाज्वल्य अभिमान आहे म्हटलं ! </div>
<div>
मुंबईकर: (तोंड वेंगाडत) हो का? असू दे हं असू दे. मला काय सांगताय? मी मुंबईकर! </div>
<div>
by the way मटा आहे का? at least तो तरी द्या. </div>
<div>
पुणेकर: (पेपर विकला गेल्याने जरा खुशीत येऊन) -- हं हे घ्या -- सहा रुपये.. </div>
<div>
मुंबईकर: सहा? मुंबईत तर ५ ला मिळतो. this is ridiculous. </div>
<div>
पुणेकर:
(पेपर परत हातात घेतो.) काका सोपी गोष्ट आहे. तुम्हाला मुंबईउन यायला
पैसे लागले ना? आणि आता तुम्ही मुंबईत आहात का? नाय ना? मग इथं पुण्याचा
दर पडणार.. द्या ६ रुपये. विंग्रजी झाडू नका उगाच त्यानं पैसे नाही कमी
व्हायचे </div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर नाखुशीने ६ रुपये देतो -- </div>
<div>
<br /></div>
<div>
एक छोटा साधारण ६-७ वर्षाचा मुलगा विंगेतून पळत येतो. काका एक सकाळ द्या. </div>
<div>
पुणेकर: हं हे घे बाळ .. ४ रुपये. </div>
<div>
मुलगा: काय चार रुपये! </div>
<div>
(प्रेक्षकांकडे बघून) --- भलतीच महागाई आहे.. माझ्या लहानपणी नव्हती एवढी.!! (</div>
<div>
मुलगा विंगेत परत पळत जातो. </div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर: तुम्ही वाचता का मटा ? I mean महाराष्ट्र टाइम्स?</div>
<div>
पुणेकर: नाही आम्ही फक्त सकाळ वाचतो.. तुमच्या सारखे काही लोकं मागतात म्हणून विकायला एवढंच </div>
<div>
मुंबईकर: बरोबर आहे.. </div>
<div>
पुणेकर : काय हो, काय बरोबर आहे म्हणाला?</div>
<div>
मुंबईकर: स्वस्त आहे ना सकाळ? जातीवंत पत्रकारिता काय कळणार म्हणा? </div>
<div>
पुणेकर: ओह भाऊ आम्हाला शिकवू नका पत्रकारिता .. इथे सदाशिव पेठेत शेंबडा पोरगा सुद्धा जास्त माहिती </div>
<div>
जमवून असतो. आणि स्वस्त आहे असले तरी आमचे पुणेच मस्त आहे. </div>
<div>
मुंबईकर: ह ते आहे मुंबईसारखी महागाई कुठे सापडणार नाही.. </div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर पेपर वाचायला लागतो. एक्दम हसतो. </div>
<div>
<br /></div>
<div>
पुणेकर: काय हो? दात काढायला काय झालं आता? (पुणेकर सरळ प्रश्न विचारणार नाही कधी)</div>
<div>
मुंबईकर: काही नाही हि बातमी वाचली .. मागच्या आठवड्यात तुमचा एक पुणेकर मुंबई च्या थिएटर मध्ये हुज्जत घालत होता म्हणे </div>
<div>
पुणेकर: कशावरून? </div>
<div>
मुंबईकर: पैसे परत द्या म्हणे.. हॉरर सिनेमा होता म्हणून मी डोळे मिटून बसलो आणि सिनेमा बघितलाच नाही. </div>
<div>
पुणेकर : बर मग?</div>
<div>
मुंबईकर: तो थिएटर मॅनेजर पण मुळचा पुण्याचा असणार -- डोळे बंद होते पुरावा दाखव म्हणाला !</div>
<div>
<br /></div>
<div>
आणखी एक माणूस विंगेतून येतो.. (हा नागपूरकर) </div>
<div>
इकडे तिकडे काहीतरी शोधक नजरेने बघतो..</div>
<div>
<br /></div>
<div>
नागपूरकर: अबे एकपण ठेला नाही का बे इथे? </div>
<div>
पुणेकर: ओ -- शिव्या कुणाला देताय? </div>
<div>
नागपूरकर: शिव्या कधी देऊन राहिलो बे .. मी तर ठेला विचारून राहिलो ना .. </div>
<div>
पुणेकर: शिव शिव .. पुन्हा असभ्य भाषा.. कुठून कुठून लोक पुण्यात येतात ते ओंकारेश्वर जाणे.. वाचवं रे बाबा </div>
<div>
नागपूरकर: पण ठेला आहे का सांगा ना बे .. </div>
<div>
मुंबईकर: you see mister तुम्हाला काय हवे आहे ते कळत नाही नीट सांगता का? </div>
<div>
नागपूरकर: अबे ठेला पानाचा ठेला बोलून राहिलो ना मी मगाचपासून -- हे पुणेकर तिसराच अर्थ काढून राहिले ना ..</div>
<div>
मुंबईकर: ठेला? तुम्हाला पानाचा ठेचा म्हणायचे आहे का? </div>
<div>
नागपूरकर:
काय चेष्टा करून राहिले भाऊ तुम्ही .. ठेचा तर आम्ही जेवताना खातो ना ..
ठेला म्हणजे पान भेटते ना जेवण झाल्यावर ते म्हणून राहिलो मी. </div>
<div>
पुणेकर:
एक तर असभ्य आणि अगम्य भाषा वापरता. ठेला काय? शुद्ध मराठी बोला कि..
त्याला पानाची टपरी म्हणतात.. ती बघा समोर कोपऱ्यातून डावीकडे वळा - नंग्या
मारुती विचारा त्याच्या समोर मुंजोबाचं बोळ आहे -- द्या २ रुपये. </div>
<div>
नागपूरकर: कसले २ रुपये? </div>
<div>
पुणेकर: पाटीकडे बोट दाखवतो -- पत्ता सांगायचे २ रुपये पडतील. </div>
<div>
नागपूरकर
हे लै भारी होऊन राहिले .. आणि काय हो तुमच्या पुण्यात नावं काय नंग्या
मारुती काय? मुंजोबाचं बोळ काय?नागपूर ला येऊन बघा ना राव. कशी भारदस्त
नावे आहेत. सीताबर्डी, नंदनवन, रामेश्वरी कशी दर्जेदार नाव.. </div>
<div>
पुणेकर: (निरुत्साहाने) २ रुपये? </div>
<div>
नागपूरकर: लिहून ठेवा ना - भागून थोडेच चाललो मी </div>
<div>
पुणेकर: भागून? आम्ही फक्त गणितात भागाकार करतो. </div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर: पुण्यात फार गरम व्हायला लागलं नै?</div>
<div>
नागपूरकर:
ह्याला उकाडा म्हणून राहिले का भाऊ तुम्ही? आमच्या नागपूरला येऊन बघा.
अहाहा काय तो उकाडा! अहाहा काय छान संत्री. ! मस्त वऱ्हाडी ठेचा बरोबर
जेवण करून दुपारच्या टायमाला संत्री खाऊन मस्त पडायचे -- अहो स्वर्गसुख इथे
कळणार का बे पुण्यात? मला तर वाटते इथल्या प्रत्येकाने नागपूरला येऊन एकदा
उन्हाळा अनुभवाला पाहिजे -- ते सुख बाकी कुठे नाही!</div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर कसनुसा हसतो. सारखा बस येतेय का ते वाकून वाकून बघतो.. पण बस न दिसल्याने बैचेन आणि घडाळ्याकडे बघतो.. </div>
<div>
<br /></div>
<div>
पुणेकर:
ओ ते नागपूरचं कौतुक बास झालं. इथे पुण्यात पण ४२ चा पारा असतो म्हणलं
हल्ली. उगाच नाही ती म्हण आहे: "पुणे तिथे काय उणे"!</div>
<div>
मुंबईकर: हो ते कळतंच आहे इथले खड्डे पाहून.. </div>
<div>
पुणेकर: तरी बरं तुमच्या मुंबईसारखं दार पावसाळ्यात तुंबत नाही ! </div>
<div>
नागपूरकर : कुछ भी ! पावसाळा पाहिजे तर नागपूरचा -- काय एकेक सर असते .. अहाहा .. तुम्ही याल तर खुश होऊन झालं ना बे. </div>
<div>
पुणेकर:
हो तर ... जसा काही स्वर्गातून थेट पाऊस पडतो तुमच्या नागपुरात ! काय पण
एकेक कौतुक. आता सांगाल नागपुरात छान गुलाबी थंडी पडते. आधीच सांगतो गुलाबी
थंडी फक्त पुण्यात पडते. नागपुरात पण तशी थंडी असते असे सांगून सार्वजनिक
अपमान करून घेऊ नका.. </div>
<div>
नागपूरकर : थंडीच जाऊ द्या हो .
नागपूरला हल्दीराम चे स्नॅक्स खायला या ना भाऊ .. एक्दम झकास ताजे मिळतील
.. तुमचा दिल एक्दम खुश होऊन राहील ना.. </div>
<div>
पुणेकर नागपूरकरांच्या मागे जाऊन डोक्याकडे बघतो.. </div>
<div>
नागपूरकर: काय हो? काय झालं? </div>
<div>
पुणेकर:
नाही डोक्याला कुठे मार लागलाय का ते बघत होतो .. काय पण कौतुक सांगताय
--- आणि ते पण कुणाला? आणि खुद्द पुण्यात येऊन? ती रांग बघताय काय? </div>
<div>
नागपूरकर: काय काही मुफ्त वाटप सुरु आहे का? </div>
<div>
पुणेकर:
बाकरवाडीसाठी रांग आहे ती.. ताजी बाकरवडी खाऊन जे लहानाचे मोठे झाले
त्यांना त्यांच्याच शहरात तुम्ही हल्दीरामच्या गोष्टी सांगता म्हणजे
तुमच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते.. कुठून कुठून लोक येतात
पुण्यनगरीत देव जाणे.. </div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर: अजून बस आली नाही. लेट झाली कि काय </div>
<div>
पुणेकर: सारखे वाकून वाकून काय बघता हो? तुमच्याकडे तर वाकून बघितल्यावर लोकल ट्रेन लवकर येतात का? इथे सगळे PST प्रमाणे चालते. </div>
<div>
मुंबईकर: PST? म्हणजे काय? </div>
<div>
पुणेकर: अज्ञान -- घोर अज्ञान.. PST म्हणजे पुणे स्टॅंडर्ड टाइम ! ते उगाच वेळापत्रक वगैरे आम्ही सहज गंमत म्हणून छापतो.. </div>
<div>
मुंबईकर आणि नागपूरकर विस्मयाने एकमेकांकडे बघता.. </div>
<div>
मुंबईकर: हे म्हणजे जरा अतीच झालं - आमच्यासारख्यानी करायचं काय मग? </div>
<div>
पुणेकर: अति काय हो? अति काय आहे त्यात? प्रत्येक शहराची वेळ असते. एक चेहरा मोहरा असतो ना तशी हि आमची खास पुणेरी </div>
<div>
पुणेकर मधूनच निघायला लागतो.. </div>
<div>
<br /></div>
<div>
मुंबईकर : का हो? निघालात इतक्यात? काही गिऱ्हाईक येताना दिसतायेत. </div>
<div>
<br /></div>
<div>
पुणेकर:
घड्याळ बघा ... १ वाजला. १ ते ४ PST प्रमाणे काहीही होत नाही.. आणि त्या
वेळात कितीही तात्विक असले तरी आम्ही वाद घालत नाही.. </div>
<div>
<br /></div>
<div>
पुणेकर निघून जातो आणि नागपूरकर आणि मुंबईकर कपाळावर हात मारून घेतात! </div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
</div>
<div>
</div>
<div>
<br /> </div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
</div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-52545426957611578512018-10-18T16:33:00.003-07:002018-10-18T16:33:50.042-07:00चोरीची शिक्षा आणि शिक्षण<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /><br />मी सहावीत असतानाची गोष्ट. तसा मी
अभ्यासात हुशार गणला जायचो पण शाळेत कधी पहिला आलो नव्हतो. आमच्या
वर्गातील एका मुलीनं -- पल्लवीन -- तिचे स्थान अबाधित ठेवलं होतं! बर
अभ्यासेतर क्षेत्रातही तिचा तोच पायंडा होता. वर्गात सगळ्यांना तिचा हेवा
वाटायचा.<br />सहामाहीत तिचा पहिला नंबर आला पण तिच्यात व माझ्यात १४ गुणाचे
अंतर होते. वार्षिक परीक्षेत ती ते अंतर ५० पेक्षा वाढवेल याची
तिच्यापेक्षा मलाच खात्री होती.<br />परीक्षेत माझा नंबर तिच्या मागे आला
होता. गणिताचा पेपर होता. माझे गणित चांगले असले तरी वेग नव्हता. सराव
करायचा कंटाळा करायचो. वर्गमूळ व घनमूळ काढायचे प्रश्न जाम छळायचे! मी
माझ्या वेगाने पेपर सोडवत होतो. पल्लवी एकामागून एक पुरवणी मागत होती. पेपर
सुटायला २०-२५ मिनिटे बाकी असतानाच तिने पेपर दिला व ती बाहेर पडली. असं
कुणी केलं ना की मला जाम टेन्शन यायचं. मी जरा वेगाने लिहायला सुरुवात
केली तेवढ्यात माझी पेन्सिल खाली पडली. ती घ्यायला मी बाकाखाली वाकलो.
तेवढ्यात पायापाशी मला कागद दिसला. मी तो पाहिला आणि क्षणभर दचकलोच.
पल्लवीने तिच्या सुवाच्य अक्षरात लिहीलेली पुरवणी होती. मला नीट न येणारा
घनमूळाचा प्रश्न व्यवस्थित सोडवला होता. त्याच्या पुढे भूमितीय प्रमेय
सोडवले होते.<br />काय करावे मला सुचेना. सांगाव का सरांना? की काॅपी करावी?
की तसाच सोडून द्यावा? शेवटी मोहाने विजय मिळवला व मी ते उत्तर तसेच कांपी
केलं. पल्लवीची पुरवणी तिथेच बाकावर सोडली व पेपर देऊन टाकला. शेवटचा पेपर
असल्याने सुट्टया लागल्या.<br />दीडमहिन्यानंतर निकालासाठी शाळेत गेलों. मी
पूर्ण शाळेत पहिला आलो होतो! माझा विश्वास बसेना. गणितात मला १०० पैकी
९६ गुण मिळाले होते. पल्लवी दुसरी आली होती. तिला माझ्यापेक्षा ४ गुण कमी
होते व गणितात फक्त ती १४ गुणांनी मागे होती. मला आठवलं की पुरवणीतले
प्रश्न १४ गुणांचे होते! म्हणजे मी तिचे गुण चोरून पहिला आलो होतो! कधीच
पहिला नंबर न सोडणारी पल्लवी दुसरीआली याचं सर्वांना विशेष वाटत होतं.
तेव्हा वर्गात मुलं विरुद्ध मुली अशी स्पर्धा असायची. नेहमी मुलींचा नंबर
पहिला असतो याचा मुलींना फार अभिमान होता. आज अनेक मुली हिरमुसल्या
होत्या. काही माझ्याकडे रागाने पाहात होत्या. पल्लवी थोडीशी रडवेली वाटत
होती पण तेवढ्यात ती माझ्याजवळ आली व मला ‘अभिनंदन!’ म्हणाली. मी थॅंक्यू
म्हणत कसनुसं हसलो. तिच्या मनाच्या मोठेपणामुळं मलाच ओशाळल्यागत झालं..<br /><br />घरी
आलो तेंव्हा घरात निकाल सांगितला. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. माझ्या आजीला
फार कौतुक वाटलं. तिन लगेच जाऊन पेढे आणले व देवापुढं ठेवले. तेंव्हा
आम्ही वाड्यात राहायचो त्यामुळे कानोकानी हि वार्ता घरोघरी झाली आणि
पेढ्यांचा डबा हळूहळू रिकामा होऊ लागला. मला आनंद झाला पण मनात एक अनामिक
टोचणी लागली होती. काय करावं कळत नव्हतं आणि अभिनंदनाचा रतीब सुरु
असल्याने बाकी काही विचार करायला वेळ नव्हता. माझ्या काकांनी मला बक्षीस
म्हणून महात्मा गांधींवरच एक पुस्तक दिले. त्यात गांधीजींच्या लहानपणाच्या
गोष्टी होत्या.<br /><br />दुसऱ्या दिवशी मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली.
त्यात गांधीजी लहान असताना मित्रांबरोबर कुठेतरी आणि मित्राने टिंगल केली
म्हणून त्यांनी मांस खाल्ले आणि पैशासाठी भावाच्या सोन्याच्या कड्याचा एक
तुकडा तोडून विकला अशी एक गोष्ट होती. त्यानंतर ते घरी आले व याविषयी
त्यांच्या आजोबांशी खोटं बोलले. पण नंतर पापभीरू मोहनदासला राहवलं नाही आणि
ते आजोबांच्या खोलीत जाऊन रडले व त्यांची माफी मागितली. तो प्रसंग माझ्या
मनात घर करून राहिला.<br /><br />पुढे एक दिवसानंतर माझ्या आजीची एक मैत्रीण
(आम्ही त्यांना बापट आजी म्हणायचो) आमच्या घरी आली होती. माझे कौतुक
म्हणून त्यांनी एक स्वतः विणलेली पिशवी आणली होती. आजीने
सांगितल्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला व बापटआजी माझं कौतुक करायला
लागल्या .. पण मला ती गांधीजींची गोष्ट आठवायला लागली आणि मला रडू यायला
लागलं. आजीला नक्की काय झालं कळेना. रात्री परत मुसमुसत मी आजीला सगळी
परीक्षेत मला पुरवणी कशी सापडली व मी 'कॉपी' कशी केली याची गोष्ट सांगितली.<br /><br />आजीनं
माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाली "हे बघ चोरून मिळालेलं काहीच पचत
नाही आणि रुचत नाही. यश कसं निर्भेळ हवं! त्याचा अभिमान वाटायला हवा.
नाहीतर हे आपलं मन असं आपल्याला कुरतडत बसतं आणि ते पचत नाही. तू
पल्लवीची उत्तर चोरलीस पण तिच ज्ञान चोरू शकतोस का? नाही ना? आता यापुढे
शपथ घे कि कुठलीच गोष्ट फुकट मिळते आहे, चोरून वापरणार नाही." मी तशी शपथ
घेतली.<br /><br />मग आजीने विचारले "तुला एवढ्या लोकांनी भेटवस्तू दिल्या त्यातली तुला सगळ्यात आवडलेली कुठली?"<br />नाजूक
कलाकुसर केलेली बापट आजीनी दिलेली पिशवी मला फार आवडली होती. मी लगेच
आजीला तस सांगितलं. तेंव्हा आजी म्हणाली कि ती पिशवी तू पल्लवीला भेट दे.
कारण त्यावर खरा हक्क तिचा आहे.<br /><br />मी थोड्याश्या नाखुशीनेच ती छान
पिशवी पल्लवीला दिली. तिला विशेष वाटलं.. पण त्या कृतीतून झालेला संस्कार
मोठा होता व तो मला आयुष्यभर पुरला. त्यानंतर परत कुठलीच चोरी करायचा मोह
झाला नाही. जी गोष्ट आपली नाही तरी ती सहजगत्या, कष्ट न करता मिळत असेल तर
त्यावर आपला अधिकार नाही ही आजीची शिकवण अजून पुरते आहे.<br /><br />पुढे मोठा
झाल्यावर पीएचडी करताना plagiarism बद्दल वाचलं आणि लहानपणी झालेला हा
संस्कार किती महत्वाचा होता त्याची प्रकर्षाने जाणीव झाली.<br /><br />[सत्य असत्याची सांगड घालून केलेला हा कपोलकल्पित लेख आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.]</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-42612956963251981122018-08-25T08:31:00.002-07:002018-08-25T08:31:10.771-07:00कल्पकता आणि मी <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
कल्पकता आणि मी </div>
<div>
<br /></div>
<div>
मी लहानपणापासून फार
कल्पक आहे अशी माझी समजूत आहे. शाळेतल्या प्रगतीपुस्तकावर त्या वेळच्या
बाईंनी "मुलगा शांत समजूतदार आहे, नवीन कल्पनांचे नावीन्य आहे" असा शेरा
मारल्याचे मला अजूनही स्मरते. अर्थात माझ्या कल्पकतेचे घरच्यांना आणि विशेष
म्हणजे माझ्या बहिणीला फार वावडे होते.
एकेकाळी शास्त्रीय प्रयोग म्हणून बहिणीची पांढरी साधी हळदीमध्ये भिजवून
साबणाच्या पाण्यात धुऊन लाल करून दिल्यापासून तर माझ्या कल्पनांचा विस्तार
कसा खुंटेल हे पाहणे जणू तिचे प्राथमिक कर्तव्य झाले होते !</div>
<div>
</div>
<div>
असो.. पिकते तिथे विकत नाही ह्या न्यायाने अस्मादिकांनी डोके चालवून
काहीतरी छान कल्पना काढावी आणि सांगायला सुरुवात करताच "तू गप्प बस रे" असे
म्हणून तिचा पूर्ण जन्म होऊ देऊ नये किंवा कधीकाळी ती सगळी मुखातून बाहेर
पडलीच तर त्याची यथेच्छ टिंगल टवाळी करावी असे कैक प्रसंग माझ्या बालपणी मी
पचवले आहेत. पण कल्पकता हा माझा स्थायी भाव असल्याने वाढत्या वयाबरोबर ती
वाढतच गेल्याचे मला प्रकर्षाने जाणवले आहे. </div>
<div>
<br /></div>
<div>
पण
हल्ली हल्ली विशेषतः लमालसाठी लिखाण करायला घेतल्यापासून माझी कल्पकता कमी
झाली आहे असे मला वाटायला लागले. म्हणजे हेच बघा ना की कुठलाही विषय दिला
की साधारण १/१.५ महिना मला काहीच सुचत नाही. सुचायला लागलं कि मन कुठंतरी
भरकटते आहे असं वाटतं. पूर्वी हा हा म्हणता आठवड्यात ४ कविता आणि २ दीर्घ
लेख किंवा गेला बाजार २/४ लघु कथा लिहिणारा मी एकदम असा कल्पनाखोर
(दिवाळखोरच्या धर्तीवर) होईल असे मला मला कधी वाटले नाही. बरोबर जमलेली
मंडळी त्यांचे छान छान लेख वाचून दाखवतात, व टाळ्या शिट्ट्या मिळवतात आणि
मला मात्र मक्ख चेहऱ्याच्या प्रतिक्रिया पाहाव्या लागतात किती ओशाळल्यागत
होतं म्हणून सांगू .. छे हे काही खरं नाही!. कल्पना सुचत नाही म्हणजे काय
.. काहीतरी केलंच पाहिजे ह्या विचाराने मी पछाडला गेलो. अशा अवस्थेत काही
दिवस घालवल्यावर मी यावर काय उपायजोजना करता येतील ह्याचा विचार सुरु केला.
</div>
<div>
<br /></div>
<div>
सर्व प्रथम जवळच्या ग्रंथालयात जाऊन
'कल्पकता आणि सर्जनशीलता यांचे व्यवच्छेदक विश्लेषण' नावाचा ६०० पाणी ग्रंथ
आणला. ह्या विषयात तज्ज्ञ असलेल्या एका प्रसिद्ध लेखकानेच तो लिहिला होता.
आता तो ग्रंथ वाचला कि झाले मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल याची मला
खात्री होती. पण झालं उलटंच -- त्या दिवशी आमच्या हिनं मस्त पुरी व कांदा
बटाटा रस्स्याचा बेत केला होता. बाकी आमची ही काय फक्कड रस्सा करते..
तिच्या हाताची पुरी आणि रस्सा माझा 'वीक पॉईंट' त्यामुळे जेवण जरा अंमळ
जास्तच झालं -- अर्थात त्या ग्रंथाचा उपयोग हा जड झालेल्या डोक्याला आधार
म्हणून झाला हे दुपारच्या चहाला हिन उठवलं तेंव्हाच कळलं!</div>
<div>
हे
असं पुस्तक वाचून वगैरे काही कल्पकता वाढणार नाही हे थोड्याच वेळात लवकरच
माझ्या ध्यानात आलं मग एकदम सुचलं.. आता जरा पम्प्याला विचारलं पाहिजे. </div>
<div>
पम्प्या
म्हणजे पंकज परांजपें -- माझा बालमित्र --
आद्याक्षर जुळवून
त्याचा "पम्प्या" झाला शाळेत असल्यापासूनच त्याचं डोकं वेगळं चालायचं.
त्याची गती शिक्षकांना समजली नाही ते त्यांचं दुर्दैव! पम्प्याला ज्या
कल्पना सुचत त्याचा वापर केला तर राष्ट्राची एकदम वेगवान प्रगती होईल यात
शंका नाही असे त्याचे मत आहे. कधी कधी त्याच्या कल्पना अंमलात आणताना
अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागत.. मागे त्याने घरी पाळलेल्या गोल्डफिशला
प्राणायाम शिकवायचा प्रयत्न केला होता तो फसला .. पण कल्पक माणसाच्याकडून
चुका होणारच नाही का? </div>
<div>
तर मी पम्प्याला घेऊन शेजारच्या
इराण्याच्या हॉटेल मध्ये गेलो.. त्याच्या आवडीची टोस्ट अन चहा मागवला.
चहा आणि टोस्ट पोटात गेल्यावर पम्प्याची गाडी सुरु झाली.. </div>
<div>
"बोल बाबू नक्की काय प्रॉब्लेम आहे?"</div>
<div>
"काही नाही रे -- मला ना नवीन कल्पनाच सुचत नाहीत बघ. काय करावं कळत नाही." मी थेट विषयालाच हात घातला. </div>
<div>
"बरं धिस इस अ केस ऑफ क्रीएटिव्ह ब्लॉक" -- पम्प्या जोमात आला कि त्याची गाडी इंग्लिशवर घसरते..</div>
<div>
"ह बोल काय करू शकतो?"</div>
<div>
"अरे सोपं आहे.. तुझा आहार बदल.. इट ऑल कम्स डाउन टू फूड यू नो "</div>
<div>
"म्हणजे? आता काय करू"</div>
<div>
"अरे
हेच बघ ना -- कॉलेजला असताना तुला खूप कविता शेर सुचायचे कि नाही? आठवं
आठवं -- नाहीतर प्रियाला विचार !" मिस्कील हसत टोस्टचा तुकडा खात पम्प्या
म्हणाला. </div>
<div>
हे मात्र खरं होत कॉलेज मध्ये प्रियाला पटवताना अनेक कविता सुचायच्या . </div>
<div>
"हो ते खरं .. पण त्याचा काय संबंध?"</div>
<div>
"आहे,
संबंध आहे! तेंव्हा तू काय खात होतास? रिमेम्बर -- फक्त मॅगी, रोमेन
नूडल्स आणि वडापाव. आय टेल यू बाबू ह्या वडापामुळेच अनेकजण चांगले लेखक
झालेत.. "</div>
<div>
पम्प्याच्या बोलण्यात तथ्य दिसलं म्हणून मग मी नेहमीच
जेवण सोडून सकाळ संध्याकाळ मॅगी आणि वडापावचा रतीब लावला. कल्पनाशक्ती
मध्ये जरी काही बदल दिसला नसला तरी शारीरिक आकारात मात्र बदल लगेच जाणवायला
लागला.. शिवाय रोजच जेवण उरायला लागलं त्यामुळे प्रियाला पण मी बाहेर
मित्राबरोबर सामिष खात असावा असा नाहक संशय येऊ लागला. </div>
<div>
हे काही फार काळ टिकणारं नव्हतं म्हणून मी परत पम्प्याला सांगितलं. </div>
<div>
<br /></div>
<div>
"बाबू - तू योगा करतोस का?"</div>
<div>
"अरे तू सांगितलेले वडापाव आणि मॅगी खाऊनच असा आकार झालाय १५ दिवसात . आता काय आणखी मस्करी करतोस?"</div>
<div>
"अरे नाय रे.. मी कालच एक लेख वाचला आणि मला कळलं कि तुला काही सुचत का नाही ते".. </div>
<div>
"सांग तर खरं.."</div>
<div>
"हे बघ .. मला सांग तुझं काम कसं -- बैठं! - सारख आपलं ते कॉम्पुटर पुढं बसायचं आणि तो कीबोर्ड बडवायचा" </div>
<div>
"त्याचा काय संबंध?" मी त्रासिकपणे विचारले. </div>
<div>
"आहे .. संबंध आहे. त्यामुळे सगळं रक्तप्रवाह पायाकडे वाहतो आहे .. मेंदूला पुरेसं रक्त मिळत नाही त्यामुळे त्याची वाढ खुंटली आहे!"</div>
<div>
मेंदूची
पण वाढ या वयात होत असते यावर माझा विश्वास बसला नाही पण पम्प्याचे वाचन
अफाट असल्याने असल्या शंका विचारणे म्हणजे त्याचा अपमान झाला असता. </div>
<div>
"तू एक काम कर.. शीर्षासन करायला लाग.. रोज १५ मिनिटं आणि बघ कशा सटासट कल्पना सुचतात तुला.." समोरचे भजे खात पम्प्या म्हणाला.. </div>
<div>
पम्प्या वाक्य प्रमाणम मानून मी एक योगा करायचे साहित्य घेऊन आलो. </div>
<div>
तेवढं एक काम पंकजभाऊजींनी चांगलं केलं असा माझ्या पोटाकडे बघून हीन केलेला
तिरकस शेरा
मला ऐकू आला पण त्याकडे दुर्लक्ष करून आता कल्पनाशक्ती वाढणार या उमेदीने मी सुरुवात केली. </div>
<div>
शीर्षासन
करण ही सोपी बाब नाही हे न कळण्याइतका माझा मेंदू खुंटला नव्हता ..
त्यामुळे मी भिंतीच्या आधाराने सुरुवात केली. दोन उश्या व त्यावर डोके
ठेवून उलटा झालो खरा पण तेवढ्यात पाय लागून वरचे शेल्फ खाली आले --
त्यातली शोपीस, फोटो फ्रेम, पुस्तके, घड्याळ हि एकेक वस्तू मित्राच्या
मदतीला धावावी अशाप्रकारे खाली आली .. काचेच्या शोपीस डोक्यात दाणकन
आपटला.. आणि वाढत्या वयानुसार वाढलेल्या शरीराचा भार पुरेसा रक्तप्रवाह न
झालेली मान सोसू न शकल्याने लचकली. </div>
<div>
<br /></div>
<div>
तेंव्हापासून मी कल्पनाशक्तीचा विकास कसा होईल या विवंचनेत आहे. तुम्हाला काही कल्पना असेल तर सांगाल का? </div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
<div>
<br /></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-66745079522113050762018-06-11T13:39:00.004-07:002018-06-11T13:39:27.796-07:00स्पर्श <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<div>
<div>
<div>
स्पर्श <br />-----------<br /></div>
<div>
लमालचा विषय स्पर्श आहे असं ऐकल्यावर माझं मन एकदम फिरायला गेलं आणि ज्याला ज्याला स्पर्श करून आलं त्याच हे संकलन. .. ..
तसं पाहिलं तर हे सगळं भरकटलेलं लिखाण आहे पण तरी त्यातून काही नवीन माहिती मिळेल असं वाटतं.
</div>
<div>
<br /></div>
<div>
त्वचा हा पंचेंद्रियांमधला सगळ्यात मोठा अवयव/ इंद्रिय. कापऱ्या थंडीचा
किंवा उन्हाचा स्पर्शच आपल्याला त्याची जाणीव करून देतो. आपल्याला स्पर्श
जाणवतो त्यामागची प्रक्रिया मात्र मोठी आहे.
आपण किती गोष्टी गृहीत धरून असतो ना .. त्यातलीच एक स्पर्श संवेदना.. किती
गोष्टी कळतात फक्त स्पर्शातून? वस्तूचे तापमान, पोत (गुळगुळीत किंवा खरबरीत
पणा) एवढंच नाही तर स्पर्शामागची भावना देखील! हे सगळे वर्गीकरण
करण्याची प्रक्रिया मेंदू क्षणार्धात करतो! मला वाटतं स्पर्श साठवून
ठेवण्याची काहीतरी वेगळी केंद्रे असतात. नवीन स्पर्श झाल्याने जुन्या
आठवणी पुसल्या जात नाहीत. कधीकधी तर त्या उफाळून जाग्या होतात. (हे दोन्ही
चांगल्या व वाईट बाबतीत होते.) बघा कदाचित तुम्हाला अजूनही लहानपणचे काही
स्पर्श आठवत असतील..आईनं/आजीनं केलेलं अवघ्राण असेल किंवा पहिल्यांदा गरम
चटका बसला ते असेल.. अर्थात सगळे स्पर्श लक्षात राहतीलच असे नाही.
स्पर्शसंवेदना शरीरात विषमपणे पसरलेली असते. म्हणजे हात, जीभ, ओठ येथील
स्पर्श पाय किंवा पाठीवरील स्पर्शापेक्षा हजारो पटीने अधिक तीव्रतेने
जाणवतो. </div>
<div>
***</div>
<div>
काही वर्षांपूर्वी काही
मनोवैज्ञानिकांनी एक प्रयोग केला. ३ ते ५ वयोगटातील काही मुले व त्यांच्या
आया एकत्र केल्या. काही वेळाने मुलांना एका खोलीत ठेवले व आयांना दुसऱ्या
खोलीत. प्रत्येक मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि सर्व आया ज्या खोलीत
होत्या त्या खोलीत सोडले. फक्त स्पर्शाने मुलाला आई ओळखता येते का हे
पाहायचे होते. जवळ जवळ सगळ्यांना आपापली आई फक्त स्पर्शाने ओळखता आली
(ह्यात कदाचित थोडा भाग वासाचा पण असावा.) म्हणजे एवढ्या लहान वयात मेंदूची
पूर्ण वाढ झालेली नसताना देखील स्पर्शज्ञान अचूक असतं .. एवढंच कशाला अगदी
तान्ह्या बाळाला देखील त्याच्या आईचा स्पर्श व इतरांचा स्पर्श अचूक ओळखता
येतो हे कळून येते. ही स्पर्शाप्रगल्भता वयानुसार वाढत जाते का? की काही
काळानंतर आपण आपली संवेदनशीलता हरवून बसतो व त्यामुळे ती कमी कमी होते?
आपल्याला जवळची माणसे स्पर्शाने कोण आहे हे ओळखता येईल का? (इथे जवळची हा
शब्द मानसिक अंतराशी संबंधित आहे हे जाणकारांनी ओळखलेच असेल.) </div>
<div>
</div>
<div>
***</div>
<div>
तुम्ही
पीटर कॉलिन्सचे नाव कदाचित ऐकलेही नसेल. त्याच्यावर पोलीस सहकाऱ्याचा
खून केल्याचा गुन्हा आहे.
तो गेले ३० वर्ष कॅनडाच्या तुरुंगात आहे.
शिवाय हा एकांतवास आहे म्हणजे त्याचा कुठल्याही माणसाशी थेट संपर्क अतिशय
कमी प्रमाणात येतो. विचार करा -- गेले कित्येक वर्षे एकांतवासात, ६ फूट
बाय ९ फूट मध्ये काढलेला हा माणूस .. त्त्याच्या तुरुंगात एक माशी शिरली व
ती त्याच्या पाठीवर, तोंडावर बसत होती. त्यावरून त्यानं "व्हॉयसेस फ्रॉम
सॉलिटरी" हा लघुचित्रपट केला आहे. माणसाला स्पर्शाची भूक किती असते ह्याच
ते हलवून सोडणारं, हृदयस्पर्शी आणि अंतर्मुख करणारं भाष्य आहे. (ह्या
लघुचित्रपटाचा दुवा <a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=https://www.youtube.com/watch?v%3DCUs8K1jZEvs&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNE1DzqPXdaiTrYDFmK27WFkQo1rzQ" href="https://www.youtube.com/watch?v=CUs8K1jZEvs" target="_blank">येथे</a>
आहे.) हि माणसाची भूक स्पर्शाची आहे. लैंगिकतेचा पूर्णतः अभाव असणारी.
आईच्या डोक्यावर फिरणाऱ्या हाताची असेल, वडीलधाऱ्या व्यक्तीची पाठीवरील थाप
असेल, मित्राने मारलेली टप्पल असेल किंवा कुणी प्रिय व्यक्तीने दिलेले
आलिंगन असेल. ह्या सगळ्यातून ती भागत असते. त्यामुळे सर्वसामान्यपणे
आपल्या ती लक्षात येत नाही. नाहीतर स्पर्शाशिवाय मानसिक संतुलन ढळण्याचे पण
प्रकार घडतात. PTSD ने त्रस्त असलेली माणसे मानवी स्पर्शाची भुकेलेली
राहतात असे मी मागे वाचले होते. </div>
<div>
<br /></div>
ह्याच्या उलटही
प्रकार आहेत. वैद्यक शास्त्रात ज्याला डायस्थेशिया म्हणतात त्या नुरोलॉजिकल
ऑर्डर मध्ये स्पर्शसंवेदना इतकी तीव्र असते कि त्या रुग्णांना कपड्याचा व
कुठल्याही स्पर्शाचा त्रास होतो. कधीकधी हि गुणसूत्रानुसार घडलेली विचित्र
किमया असते. त्याला epidermolysis bullosa किंवा बटरफ्लाय डिसीज
म्हणतात. त्वचेला हात लावला कि तेथे त्वचा फाटते! अर्थात हे प्रमाण १०
लाखात ३०-५० एवढं कमी आहे. जन्मजात हा आजार असलेल्या बाळांना हात लावता येत
नाही, कुशीत घेता येत नाही.. त्यांच्या आयांची किती प्रचंड घुसमट होत असेल
कल्पना देखील करवत नाही!</div>
<div>
***<br /> </div>
<div>
अंध लोकांचे स्पर्श
ज्ञान अधिक तीव्र असते. कदाचित एक इंद्रिय (डोळा) निकामी झाल्याने दुसरे
अधिक कुशाग्र करायची हि निसर्गाची क्लृप्ती असावी. अर्थात जन्मतः अंध आणि
अपघाताने अंध ह्यात फरक पडतो. अपघाती अंधेपण आले असेल तर स्पर्शशक्ती
त्वरित विकसित होत नाही. अंध लोकांना कळाव्यात म्हणून भारतात (आणि अनेक)
देशांत नोटांचे आकार वेगवेगळे असतात. पण अमेरिकेत सर्व नोटांचे आकार सारखे
असून देखील अंध व्यक्ती चलन कसे ओळखतात हे मला कोडंच आहे. दृश्य प्रतिसाद
(visual feedback) नसल्याने स्पर्श संवेदना हेच त्यांचे संवादाचे माध्यम
होते. स्पर्शातून येणारी कंपने त्यांचा मेंदू अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण
करू शकतो व त्याचे आकलन करू शकतो. (अंध व्यक्तीवरून आठवलं की सर्वमान्य
झालेली ब्रेल लिपी विकसित करणारा लुई ब्रेल हा जन्मतः अंध नव्हता. तो ५
वर्षाचा असताना एका अपघाताने त्याचा एक डोळा निकामी झाला आणि जंतुसंसर्गाने
दुसराही त्याला गमवावा लागला. अनेकांना तो जन्मतः अंध होता असे वाटते
म्हणून सहज नमूद करावेसे वाटले) )</div>
<div>
<br /></div>
<div>
अंध
व्यक्तीसारखी स्पर्शांध व्यक्ती पण असतात! त्यांना कोणताही अमानवी स्पर्श
समजत नाही. अशी व्यक्ती ब्रेल लिपी देखील वाचू शकत नाही. हे होण्यामागची
कारणे अजून शास्त्रज्ञांना ज्ञात झाली नाहीत. </div>
<div>
<br /></div>
<div>
स्पर्श
विषयाला अनुसरून (कुठल्या कुठे) भरकटलेले हे लिखाण आता आवरायला हवे. वेळ
झाला तर मी वर दुवा दिला आहे ती चित्रफीत जरूर पहा. तुमच्याकडे "स्मार्ट"
फोन असेल आणि त्यावर हे वाचत असाल तर केवळ त्या दुव्याला स्पर्श केलात की
झाले!</div>
<div>
<br /></div>
<div>
स्पर्शाख्यान पूर्ण! </div>
<div>
<br /></div>
<div>
सागर साबडे </div>
<div>
संदर्भ: </div>
<div>
(१) <a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=https://brailleworks.com/braille-resources/history-of-braille/&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNHlI3Fvrn1LNC3JsBIKW6SVbpQFRA" href="https://brailleworks.com/braille-resources/history-of-braille/" target="_blank">https://brailleworks.com/brail<wbr></wbr>le-resources/history-of-braill<wbr></wbr>e/</a> </div>
(२) <a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=https://wikivisually.com/wiki/Devanagari_Braille&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNGKiJXPZDdPaANnKEO7MyjeFwk0bg" href="https://wikivisually.com/wiki/Devanagari_Braille" target="_blank">https://wikivisually.com/wiki/<wbr></wbr>Devanagari_Braille</a> </div>
(३) <a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=https://archive.org/stream/SixDots-LouisBraille-Marathi/SixDots-Marathi_djvu.txt&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNHMeiZPHv2oeE_aBsuZRIgbpkmxXQ" href="https://archive.org/stream/SixDots-LouisBraille-Marathi/SixDots-Marathi_djvu.txt" target="_blank">https://archive.org/stream/Six<wbr></wbr>Dots-LouisBraille-Marathi/SixD<wbr></wbr>ots-Marathi_djvu.txt</a></div>
(४) <a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=https://broadly.vice.com/en_us/article/d3gzba/the-life-of-the-skin-hungry-can-you-go-crazy-from-a-lack-of-touch&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNF1HTyGn3xyP__amVVaBtm077lDBA" href="https://broadly.vice.com/en_us/article/d3gzba/the-life-of-the-skin-hungry-can-you-go-crazy-from-a-lack-of-touch" target="_blank">https://broadly.vice.com/en_us<wbr></wbr>/article/d3gzba/the-life-of-th<wbr></wbr>e-skin-hungry-can-you-go-crazy<wbr></wbr>-from-a-lack-of-touch</a> <br /><div>
<div>
<a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=http://solitarywatch.com/2015/07/13/voices-from-solitary-fly-in-the-ointment/&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNF1HrB3qpoS5WUe8F2B3ia72SQxcw" href="http://solitarywatch.com/2015/07/13/voices-from-solitary-fly-in-the-ointment/" target="_blank">http://solitarywatch.com/2015/<wbr></wbr>07/13/voices-from-solitary-fly<wbr></wbr>-in-the-ointment/</a><br /><a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=https://www.vox.com/2015/1/28/7925737/touch-facts&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNE7Ix9WqcJjqccKC4RSUS98BLIT2w" href="https://www.vox.com/2015/1/28/7925737/touch-facts" target="_blank">https://www.vox.com/2015/1/28/<wbr></wbr>7925737/touch-facts</a><br /><a data-saferedirecturl="https://www.google.com/url?hl=en&q=https://en.wikipedia.org/wiki/Dysesthesia&source=gmail&ust=1528835922584000&usg=AFQjCNFOz6uRJG5uqB9XZJ1yivMbr3hTPA" href="https://en.wikipedia.org/wiki/Dysesthesia" target="_blank">https://en.wikipedia.org/wiki/<wbr></wbr>Dysesthesia</a><br /> </div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-36967122307654582092017-12-11T10:05:00.001-08:002017-12-11T10:05:12.985-08:00नियती (Ek laghukatha)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
नियती <wbr></wbr> <wbr></wbr> <wbr></wbr> </div>
<div>
</div>
<div>
* १ *<br /></div>
लक्ष्मीनं
गडबडीत दार उघडलं. आत तिचा नवरा बल्लाळ आढ्याकडे डोळे लावून पडला खाटेवर
होता. लकवा पडल्यापासून गेले ३-४ वर्षे त्याचे हेच हाल होते. सुरवातीला
जवळपासचे नातेवाईक व शेजारी गप्पा मारायला काही हवं नको पाहायला यायचे. पण
त्याचे शब्द कळायचे नाहीत मग हळूहळू लोकांचं येणं बंद होत गेलं. आता तर
वाड्यातून बाहेर पडताना सुद्धा शेजारी विचारत नाहीत. म्हणतात ना रोज मरे
त्याला कोण रडे! नवऱ्याची आमदनी बंद झाली व घरातल्या वस्तू मोडून खायची
वेळ आली तेंव्हा लक्ष्मीला कामासाठी बाहेर पडणे भाग पडले. ओळखीने ४-५
लोकांच्या घरचे धुणी भांडे व साफसफाई चे काम मिळाले व हात तोंडाची गाठ
पडायला लागली. बरोबर आणलेला भात तिनं रश्श्यात कालवला व नवऱ्याला उठवून
भरवायला लागली. कसेबसे २-४ घास खाल्ले आणि अन्न त्याच्या तोंडातून बाहेर
पडायला लागलं .. खाटेवर पडून पडून बल्लाळ वैतागला होता. कुठून आपल्या
नशिबात ही परावीलंबत्व आलं! यापेक्षा मरण परवडलं असच त्याला वाटायचं.
लक्ष्मी पण या प्रकाराला वैतागली होती. रोज ४ घरची कामं करायची, लोकांची
बोलणी खायची आणि जे शिळंपाकं मिळेल ते खायचं याचा तिला उबग आला होता.
देवाला आणि दैवाला तरी किती दिवस दोष देणार? उगवलेला दिवस कसातरी रेटायचा
एवढच तिला माहिती होतं. त्या पलीकडं तिच्याकडं काहीच उपाय नव्हता. <br /></div>
<wbr></wbr> <wbr></wbr> <wbr></wbr> * २ *<br /></div>
आय
सी यू च्या बाहेरच्या कक्षात मीरा शून्य नजरेने बसली होती. कायरा ला
ऍडमिट केल्यापासून आता २ आठवडे झाले होते. कसल्यातरी फूड पॉइझनिंगच
निमित्त झालं आणि गोळ्यांची रिऍक्शन आली हसत खेळत असणारी गोड कायरा
हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. तिच्या चिवचिवाटाने घर कसं भरून जायचं! आता घर
खायला उठतं. डॉक्टर प्रधानांनी सांगितलं कि आता 'किडनी ट्रान्सप्लांट'
शिवाय काही पर्याय नाहीत. मीरा आणि मधुने सगळ्यांना सांगितलं होतं --
फेसबुक, व्हाट्सअँप वर सगळ्यांना जमेल तेवढे संदेश पाठवले होते पण अजून
काही यश नव्हतं. "या गोष्टी प्लॅन करता येत नाहीत" असे प्रधान डॉक्टर
म्हणाले आणि पटत जरी असलं तरी कळत पण वळत नाही अशी तिची अवस्था आली होती.
मीरा व मधू दोघे मोठ्या पदावर काम करत होते. एकुलत्या एक कायरासाठी कितीही
पैसे खर्च करायची त्यांची तयारी होती. पण सगळे प्रश्न पैशाने सुटतात
थोडेच? उपाय माहिती आहे, पण तरीही अजून साध्य नाही! परिस्थितीनं लादलेली
अगतिकता व त्यानं आलेला हताशपणा तिच्या नजरेत साफ दिसत होता. मधूने हलकेच
तिच्या डोक्यावर थोपटलं -- त्याच्या खांद्यावर तिनं डोकं ठेवलं आणि
डोळ्यातल्या आसवांना मुक्त्तपणे वाट करून दिली.<br /></div>
<div>
<br /></div>
<wbr></wbr> <wbr></wbr> <wbr></wbr> * ३ *<br /></div>
साबुदाण्याएवढ्या
दाण्यांन एवढ होतं ह्यावर लक्ष्मीचा विश्वास बसेना. पण धोतरीच्या फुलाचं
बी खाऊनच म्हातारा मेला असं किसन सांगत होता. तिनं हातातल्या त्या फुलाकडं
व चिमुकल्या बीकडं परत साशंकतेने पाहिलं. किसनाचा म्हातारा किती शांत व
समाधानी दिसत होता मेल्यावर ते तिला आठवलं. पूर्वी सैन्य हरल्यावर
शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून त्यांच्या स्त्रिया धोतरा खाउनच मरणाला
जवळ करायच्या असं ऐकलेलं पण तिला आठवलं. खरं होतं कि नाही ते आता जीवनाची
लढाई हरलेली लक्ष्मी पाहणार होती. तांदुळाच्या पेजेमध्ये तिन सगळं फुल
कुस्करून व बिया वाटून टाकल्या. नवऱ्याला खाटेवर बसतं करून त्याला पेज
पाजली. गेल्यादिवशी पोटात अन्न न गेल्याने कदाचित पण त्याने ती
अधाश्याप्रमाणे ओरपली. लक्ष्मीला हुंदका आला. उरलेली पेज तिन पिऊन
टाकली. तिला थोड्याच वेळात चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून दार
उघडलं आणि दारातच ती कोसळली. इतरांसाठीचा अपाय हा तिच्यासाठी उपाय ठरला
होता. <br /></div>
* ४ * <br /></div>
"मॅडम, लक्ष्मी गिरमिसे तुमच्याकडे कामाला होत्या का?" पोलीस इन्स्पेक्टर मीराला विचारत होते. <br />"येस, म्हणजे आहे." मीरानं सांगितलं. <br />"त्यांचा
व त्यांच्या नवऱ्याचा काल विषबाधेने मृत्यू झाला. तुमच्याकडून त्यांनी
पदार्थ नेले असतील तर त्यांची आम्हाला तपासणी करावी लागेल."</div>
"व्हॉट? काळ सकाळीच तर ती आली होती." मीराचा विश्वासच बसेना. काल लक्ष्मीला उरलं सुरल काय दिलं ते ती आठवायला लागली. </div>
"हो
आम्हाला दुपारी फोन आला त्यानुसार आम्ही चौकशी करत आहोत. लक्ष्मीची
परिस्थिती तिला साधारण माहिती होती. २ आठवड्यापूर्वी पगार वाढवा म्हणून ती
सांगत होती पण मीराची मनस्तिथी ठीक नसल्याने तिने तिला उडवूंन लावलं
होतं. <br /><div>
काही न बोलता मीरा इन्स्पेक्टरला नमुने घेण्यासाठी स्वयंपाकघराकडं घेऊन गेली.</div>
<br /><div>
<br /></div>
<div>
* ५ * </div>
<div>
<br /></div>
<div>
तिसऱ्या रिंगला मीराने फोन उचलला. </div>
<div>
"मीरा, कुठे आहेस तू?" मधू एकदम उत्तेजित आवाजात बोलत होता. </div>
<div>
"अरे ती आपल्याकडची लक्ष्मी ..."</div>
<div>
"ते
जाऊ दे -- लिस्टन गुड न्यूज फॉर यू. डॉक्टर प्रधान ना कायरासाठी मॅचिंग
डोनर मिळाला. मी हॉस्पिटलला जातोय. तू पण लगेच निघ. आपल्याला काही
फॉर्मलिटीज पूर्ण करायच्या आहेत. आपल्याला कायरासाठी उपाय सापडला -- शी इज
गोइंग टू बी आलराइट! चाल बाय -- निघ लगेच तू". </div>
<div>
पुढंच न ऐकताच मधून फोन ठेवून दिला. </div>
<div>
</div>
<div>
<wbr></wbr> <wbr></wbr> * ६ * </div>
<div>
<br /></div>
<div>
डॉ प्रधानांनी सगळी प्रोसिजर समजावून सांगितली. </div>
<div>
"एनी मोर क्वशन्स?" सोनेरी काड्यांच्या फ्रेम मधून बघत त्यांनी विचारलं. </div>
<div>
मधूने सही करण्यासाठी पेन काढलं. तेवढ्यात मीरा म्हणाली "मे आय नो द डोनर डॉक्टर?"</div>
<div>
"सॉरी - ते नाही मला सांगता येणार. फक्त मी एवढच सांगू शकेन कि एका
कुटुंबाचा काळ विषबाधेने मृत्यू झाला अँड वूमन्स किडनी इस परफेक्ट मॅच फॉर
कायरा"! </div>
<div>
मीरानं मधुकडं पाहिलं. कायरा पूर्ववत होणार ह्या आनंदापलीकडे त्याच्या डोळ्यात कुठल्याच भावना नव्हत्या... </div>
<div>
उपाय मिळाला पण तो असा मिळेल हा दैवदुर्विलास मीराला अंतर्मुख करून गेला. </div>
<div>
<br /></div>
<div>
<wbr></wbr> *** समाप्त ****</div>
<div>
<br /></div>
<div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-19361884347319507472017-10-31T16:16:00.001-07:002017-10-31T16:16:15.859-07:00Athavanitalya gosti.. <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
आठवणी कशा एकदम भर्रकन येतील सांगता येत नाही.. निलयला बटर खूप आवडतं
-- परवा नान गरम करून पानात वाढल्यावर त्याने पूर्ण बटर ची 'स्टिक' त्यावर
फिरवली व गरमागरम नान वर छोटा थर तयार झाला -- मग त्याने तो आधी बोटाने
थोडा खाल्ला.. ते पाहून मला आजी ताक करत असताना लोण्याचा गोळा कशी हळूच
माझ्या तोंडात घालायची ते आठवलं.. आणि कधी भाकरी केली असेल तर त्यावर मस्त
लोण्याचा गोळा व लसणाची चटणी लावून द्यायची ते आठवलं ... अहाहा काय
स्वर्गसुख होतं ते खाणं म्हणजे! आजीचं प्रेम त्यात ओथंबून भरलेलं असायचं नि
त्यामुळेच त्याची गोडी अवीट वाटायची. <br /></div>
दुसरी अशीच आठवण अली..
निलयला लसूण सोलायला सांगितलं आणि मृणाल म्हणाली २/३ दे - तर त्यानं
विचारलं कि २/३ म्हणजे २ + ३ का २ का ३ का २x३? मला गम्मत वाटली.. असं
दादा अनेकदा म्हणत असत. ४-५ द्या म्हणलं कि ४ + ५ कि ४X५ असा त्यांचा तर्क
सुरु असे. हा विचार करायची पद्धत हि जीन्स मध्ये येते का? असा मला प्रश्न
पडला.. </div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-57226034916373395932017-10-20T15:02:00.002-07:002023-10-10T22:31:17.647-07:00Appreciation of imprection<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
This thought came to my mind during my reflective silence.<br />
<span style="background-color: black;"><span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif"><b><br /></b></span></span>
<span style="background-color: black;"><span style="color: white;"><span><span style="font-size: large;"><span face=""helvetica neue" , "arial" , "helvetica" , sans-serif">No moment will be perfect. But when you begin to appreciate the imperfection of a moment, you have begun to understand how to live life.</span></span></span><br /></span></span>
<br />
This is true no matter what you are doing. No matter what you get, you will find something amiss -- and it is up to you whether you focus on what you have, repent/regret for what you are missing or strike a balance and appreciate it.</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-27200419268475240202017-09-20T13:15:00.000-07:002017-09-20T13:15:22.664-07:00Dying Everyday<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
One of the thoughts from JK that has resonated with me is "to die every day". Taken out of context it sounds a bit bizarre and absurd. But what he really means is to die to your memories, emotions, and huge psychological conditioning everyday.<br />
<br />
Can we simply live from moment to moment? Can we learn to not carry burden of the past or aspirations for the future? Can we simply live "here and now"?</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-33903756688182659582017-09-20T13:14:00.001-07:002017-09-20T13:14:35.186-07:00It's easy to blame, hard to understand<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
How often we blame weather forecaster for not being accurate? It's easy for a common man to blame as he doesn't understand intricacies of the forecasting.<br />
<br />
But it is very complex science and chaotic as shown by <a href="https://en.wikipedia.org/wiki/Edward_Norton_Lorenz">Edward Lorenz</a><br />
<br />
<br />
https://www.bbvaopenmind.com/en/when-lorenz-discovered-the-butterfly-effect/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=rrssOpenMind&utm_content=mariposa</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-38016438549036190622017-04-11T16:22:00.003-07:002017-04-11T16:22:23.450-07:00Random reflections<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<br /></div>
We are here for a brief time. For a duration unknown to us.</div>
We get onto this planet by pure chance.</div>
Each of us goes through the same journey, yet each journey is unique.</div>
Each path is unquestionably unique.</div>
We meet people along the way and form deep bond of friendship, love, affection.</div>
Each of these relationships and each bond is like no other.</div>
Some sustain the tide of time, some don't. </div>
Sometimes we get trapped into the false pretense of power, ego, etc. <br /><div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<br /></div>
<div>
I have realized ----<br /> accumulating books does not make you knowledgeable. </div>
<div>
reading more books does not necessarily make you wise.</div>
<div>
you will always get experience, learning is optional. </div>
<div>
what remains with us after we have forgotten all that is taught in school, is real education. </div>
<div>
having one friend who is noticeably biased to you, can add so much joy to your life. <br /> you can be far away from a person and still feel very close.</div>
<div>
you can sit next to a person yet still be at a faraway place.</div>
<div>
past memories are helpful only if you reflect and learn from them.</div>
<div>
it is easier to say something and then repent on it than to reflect and then say it.</div>
<div>
if you are serious enough the Truth finds you.</div>
<div>
time flies faster than we realize but life happens only in moments.</div>
<div>
Time can be your friend or foe depending on how you look at it and use it.</div>
<div>
the more fragmented life we live, more immune we are to the stress.</div>
<div>
doing something NOW has more pleasure and value than deferring the decision and repenting it later.</div>
<div>
falling in love is easy, walking together is difficult.</div>
<div>
keeping your sanity while everyone is losing theirs is easier said than done.</div>
<div>
tomorrow never comes.<br /> time spent alone is never wasted.</div>
<div>
life is a journey without specific destination and we should treat it
so without carrying burdens of the past and lingering at any one stop
more than necessary.</div>
<div>
everything changes - so either you learn to adapt or just go with the flow.</div>
<div>
wanting "just a little more" is a never-ending game.</div>
<div>
being grateful for every moment here is the only way to find true happiness.</div>
<div>
to see what's particular in what is general and what is general in what is particular is an art worth mastering.</div>
<div>
things and people are not what they seem and, sometimes, it is actually good.</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-48957295527141693482017-03-26T10:46:00.001-07:002017-03-26T10:46:09.462-07:00Sakal article on happiness<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना आनंद आणि
मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते. आपल्याला
कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या
अर्थानं जगू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मग त्यासाठी
आपल्याला विशिष्ट दिशेनं प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयींची, विचारांची
धाटणी, जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं रिप्रोग्रॅमिंग
असंल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाल्यास आनंदाची, समाधानाची बीजं पेरली
जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक सुखाची निरंतर शक्यता
निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही सकारात्मक भावना, विचार आणि
दृष्टिकोन आपला भागच बनवून टाकाव्या लागतील.<br />
या सर्व गोष्टींचा आपण आजच्या लहान आणि तरुण मुलांच्या दृष्टीनं विचार
करायला हवा. कारण हीच पिढी येत्या काळात आनंदी आणि समृद्ध समाज असेल. मुळात
मला समृद्ध आयुष्य हवंय म्हणजे त्यासाठी केवळ भरपूर पैसा हवा, भौतिक
गोष्टींची रेलचेल हवी, हा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. खऱ्या अर्थानं समृद्ध
आयुष्यासाठी माझ्याकडं सहा गोष्टी असणं गरजेचं आहे.<br />
१) शारीरिक स्वास्थ्य<br />
२) मानसिक स्वास्थ्य<br />
३) माणसांबरोबरच निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी छान नातं<br />
४) पुरेसा पैसा (लालसा कुठे सुरू होते, हे कळणं महत्त्वाचं)<br />
५) कुठल्याही क्षणी आनंदी राहण्याची कला<br />
६) समाधानी वृत्ती<br />
पहिल्या पाच गोष्टी साधल्या, की समाधानी वृत्ती येते. या सहा गोष्टी
असल्यास व्यक्तीचं जीवन समृद्ध म्हणता येईल. लहानपणापासूनच व्यक्तिमत्त्व
विकास या संकल्पनेत समृद्धी संदर्भातल्या या व्याख्येचा अंतर्भाव असायला
हवा. <br />
आज आनंदी समाजनिर्मितीच्या आड समृद्धीच्या चुकीच्या कल्पनांबरोबरच
सर्वत्र जाणवणारा वैयक्तिक आणि सार्वत्रिक ताणतणाव हे कारण आहेच. आणि
लहानपणापासूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात या दोन्ही
मुद्द्यांचा विचार व्हावा. स्पर्धेच्या युगात ताण तणाव अपरिहार्य आहेत.
त्याचबरोबर त्यांना तोंड देण्याची क्षमता मुलांमध्ये लहानपणापासून निर्माण
होणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यांचा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन
सकारात्मक असंल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास असा
व्हायला हवा, की त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर,
कणखर आणि आनंदी असायला हवं. मनाचं पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग बऱ्याच अंशी
शक्य आहे. त्यासाठी आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुलांचा
‘व्यक्तिमत्त्व विकास’कडं खूप वेगळ्या अर्थानं पाहायला हवं. व्यक्तिमत्त्व
विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता
निश्चितच नव्हे. या गोष्टींबरोबरच चांगला, जबाबदार नागरिक होणं,
समाजाप्रती संवेदनशील बनणं व शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक
आणि कणखर व्यक्तिमत्त्व बनणं हे जास्त महत्त्वाचं. आयुष्यातील चढ-उतार,
यश-अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. असं
व्यक्तिमत्त्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या ‘व्यायामशाळे’साठी
निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. या
व्यायामातून दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या
जगात यशस्वी होण्यासाठीची (आउटर जर्नी) तंत्रं, व्यायाम शिकवणारी, तर दुसरी
आंतरिक स्वस्थतेसाठीची (इनर जर्नी) साधना शिकवणारी हवी. म्हणजेच आतलं
विश्व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थानं
व्यक्तिमत्त्व विकास झाला...<br />
या सर्वांची सुरवात महत्त्वाची. ती करावी लागते मुलांच्या
व्यक्तिमत्त्व, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून.
मुलांमधील काल्पनिक भीती, स्वतःविषयीच्या नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या
आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडिओ गेम्स वा मोबाईल फोनच्या
अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टीव्हीवर दिसणाऱ्या गोंधळून
टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव
नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ
शकते. मुलांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून
व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.<br />
<strong>बाह्य आणि अंतर्गत समाधान</strong><br />
स्पर्धात्मक जगात यशस्वी व्हायचं असल्यास आउटर व इनर जर्नी या दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी प्रयत्न करावे लागतील.<br />
आउटर जर्नी ः आउटर जर्नी म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा भौतिक यशाच्या दृष्टीनं विकास होण्यासाठी पुढील गुण रुजायला हवेत.<br />
अ) आत्मविश्वास, संभाषण कौशल्यं, निर्णयक्षमता, धैर्य, सकारात्मक
विचारसरणी, दूरदृष्टी, संतुलित विचारसरणी आणि कुठल्याही परिस्थितीत शांत
राहण्याची क्षमता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व-प्रयत्नानं या
क्षमता मिळवता येतात. प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडणघडण वेगवेगळी असते.
तिला अनुसरून वेगवेगळ्या थेरपी तज्ज्ञ तयार करतात.<br />
ब) आंतरिक क्षमतेच्या विकासासाठी पुढील गुण रुजवायला हवेत.<br />
१) सहानुभूती ः समोरच्याला समजून घेण्याची क्षमता.<br />
२) कल्पकता आणि निर्मितीक्षमता ः कल्पनाशक्ती आणि सर्व क्षमता पूर्ण वापरून मी निर्मितीक्षम असलो पाहिजे.<br />
३) उत्कटता आणि तळमळ ः माझं ध्येय गाठण्यासाठी तीव्र तळमळ हवी.<br />
४) आयुष्यभरासाठी विद्यार्थी असणं ः नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम हवी.<br />
५) चांगला श्रोता ः समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता विकसित व्हावी.<br />
६) आपलं म्हणणं समजावून देण्याची क्षमता ः तार्किकदृष्ट्या आपलं म्हणणं
समोरच्याला पटवून त्याच्याकडून कृती करवून घेण्याची क्षमता हवी.<br />
७) जबाबदारी ः आपल्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेण्याची क्षमता हवी.<br />
८) नेतृत्व ः कुठल्याही मानसिकतेच्या समूहाचं नेतृत्व करण्याची क्षमता हवी.<br />
९) प्रामाणिकपणा आणि मूल्य ः आपल्या भूमिकेशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहायचा कणखरपणा हवा.<br />
१०) सर्वश्रुतता आणि सावधपणा ः आजूबाजूच्या जगात काय चाललंय, इतर स्पर्धकच नव्हे, तर जागतिक सामाजिक घडामोडींविषयी दक्ष असावं.<br />
११) अद्ययावत तंत्रज्ञान ः तंत्रज्ञान अद्ययावत होत आहे, ते आत्मसात करायलाच हवं.<br />
१२) स्वयंमूल्यमापन ः स्वतःकडं, स्वतःच्या प्रगतीकडं आणि स्वस्थतेकडं त्रयस्थपणे पाहून मूल्यमापन करायला हवं.<br />
<strong>आंतरिक स्वास्थ्य महत्त्वाचं</strong><br />
बाहेर यशस्वी होत असतानाच आंतरिक स्वास्थ्याकडं, मन:शांतीकडं होणारा प्रवास
तितकाच महत्त्वाचा आहे. बाहेरच्या यशापयशाचा माझ्या मनःशांतीवर काहीही
परिणाम होणार नाही; माझ्या मनाचा गाभा नेहमी शांत, स्वस्थ, कणखर आणि आनंदी
राहणं यासाठीचे प्रयत्न यामध्ये येतात. एकूणच माझ्या व जगाच्या
अस्तित्वाविषयीची जाण, मानवी प्रयत्नांची मर्यादा आणि हातात नसलेल्या
गोष्टींचा स्वीकार, आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करण्याचा
दृष्टिकोन यात अंतर्भूत आहे. नियमित केलेल्या ध्यानामध्ये मनाच्या डोहात
खोलवर जाऊन शांत होत जाणं यात अपेक्षित असतं. ताण तणावाचे खरे स्रोत शोधून
तणावाचं व्यवस्थापन करणं. बऱ्याचदा ताण का येतो, याची खरी कारणं आपल्या
लक्षात येत नाहीत किंवा कळत-नकळत आपण खऱ्या कारणांकडे दुर्लक्षही करतो.<br />
<strong>तणावाचं मूळ शोधा</strong><br />
दबलेल्या भावना, अपराध गंड, न्यूनगंड, दुर्बल आत्मप्रतिमा इत्यादी गोष्टी
या ताणांच्या मुळाशी असू शकतात. त्या तज्ज्ञांच्या साहाय्यानंच दूर करायला
हव्यात, अन्यथा हे ताण-तणाव आपल्याला नैराश्याच्या गर्तेत ढकलतात. त्याचा
आपल्या शरीर व मनावर विपरीत परिणाम होतो. त्यातून अनेक मनोकायिक आजार आणि
व्याधी जडू शकतात. म्हणूनच तणावाचं व्यवस्थापन लहानपणापासून शिकणं
महत्त्वाचं आहे.<br />
<strong>तणाव व्यवस्थापनाचे फायदे</strong><br />
शारीरिक तब्येत सुधारते. उत्साह, जोम प्रतिकारशक्ती वाढते. भावना स्थिर
होतात, नियंत्रणात राहतात. यातून सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन रुजायला
मदत होते.<br />
मन फोकस करण्याची क्षमता वाढते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील
कामगिरी उत्तम होते. नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद व क्षमता वाढते.<br />
<strong>ध्यानधारणा आणि साक्षीभाव </strong><br />
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार प्राणायाम व ध्यानधारणा यांचा उत्तम उपयोग
होतो. साक्षीभावानं सर्व घटना पाहण्याची सवय मन शांत ठेवते, त्याशिवाय तणाव
नियोजन अशक्य आहे. एकूणच मनःस्वास्थ्य आणि आनंद कुठल्याही परिस्थितीत
टिकवता येईल का, याचं उत्तर होकारार्थी आहे. त्यासाठी आतून स्वस्थ व्हायला
हवं. शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करायला हवं. कुठल्या गोष्टी आपल्या
आवाक्यात आहेत आणि कुठल्या नाहीत, हे शांतपणे समजून घ्यायला हवं.<br />
जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया,<br />
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया,<br />
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय<br />
माझे मला कळाया देई बुद्धी देवराया !<br />
या प्रार्थनेतील मर्म समजून घेतल्यास बरेच प्रश्न सुटतील.<br />
सर्वांच्याच संदर्भात आपलं ‘आतलं’ जग शांत राहिलं, तरच ‘बाह्य’ जगासाठी
आवश्यक असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची
क्षमता, धैर्य, तणाव (व्यक्तिगत, कौटुंबिक नोकरीतील) सहन करण्याची क्षमता
या सगळ्या गोष्टी साध्य होतील. मानसिक ताकद वाढंल आणि जगण्यातला प्रत्येक
क्षणातला आनंद वाढंल. म्हणूनच ‘आतलं’ जग शांत करण्यासाठी आणि आनंदी
राहाण्यासाठी रोज काही वेळ ‘स्व’कडं पाहण्याची सवय व्हायला हवी. नवीन
पिढीचा योग्य अर्थानं होणारा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांचं एकूणच
जीवनाविषयी आणि समृद्धीच्या कल्पनेविषयी असणारं वस्तुनिष्ठ भान आणि
सकारात्मक दृष्टिकोन यामुळंच पुढच्या काळातील समाज आनंदी राहील आणि
‘हॅपीनेस इंडेक्स’सारख्या तांत्रिक गोष्टींच्या पुढं जाऊन देश खऱ्या
अर्थानं समाधानी होईल...</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-37970704661858006412017-03-13T07:57:00.001-07:002017-03-13T07:57:18.535-07:00Live hear and now<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
From Loksatta article by Dhanashree Lele. <br />
<br />
बा. भ. बोरकर म्हणतात, ‘प्रत्येक क्षणाचा एक मध असतो, तो तेव्हाच
चाखायला हवा.’ हा क्षण नंतर अनुभवू म्हटलं तर जमत नाही.. आत्ता .. इथे
..नाऊ अॅण्ड हीअर.. नाही तर.. नेव्हर.. हीच क्षणांची परिभाषा.. ‘देवाचिये
द्वारी उभा क्षणभरी’ सांगताना माऊलींच्या मनात कदाचित हीच परिभाषा असेल.
देवाच्या द्वारी उभा राहून त्या एका क्षणाचा पुरता अनुभव घेणं, त्या क्षणात
पूर्ण मन ओतणं, आपल्या स्वत:चा विसर पडणं, म्हणजे एका अर्थाने मुक्तीच!
अशा मुक्तीसाठी एक क्षण पुरतो. कधी देवाच्या द्वारावरचा तो एक क्षण पकडणं
म्हणजे मोक्ष तर कधी मोहाचा क्षण सोडणं म्हणजे मोक्ष. घडतं ते सगळं
क्षणातच.. म्हणूनच ऋषी, मुनी, विचारवंत ‘क्षणस्थ’ व्हायला सांगतात. हातावर
घडय़ाळ आपण बांधत असलो तरी क्षण आपल्याला बांधून ठेवतात. थोडं साहित्यिक
भाषेत सांगायचं तर पुढे पुढे सरकत जाणारे क्षणबिंदू म्हणजे जीवन.. आणि
प्रत्येकाच्या क्षणबिंदूंची संख्या वेगळी. कुणाच्या वाटय़ाला किती क्षण आहेत
हे आपल्याला माहीत नाही.. म्हणून वाटय़ाला आलेला प्रत्येक क्षण जगणं,
अनुभवणं म्हणजे ‘क्षणस्थ’ होणं.<br />
<br />
कबीरांची गोष्ट आठवते. एकदा दोन माणसं खूप मोठय़ाने भांडत होती. कबीर
तिथूनच चालले होते. दोन माणसं भांडत असताना तिसऱ्याने खरं तर तिथे थांबू
नये पण तरीही कबीर तिथेच उभे राहिले. नुसते उभे नाही राहिले तर थोडय़ा
वेळाने गालातल्या गालात हसायला लागले. भांडण वाढायला लागल्यावर मोठमोठय़ाने
हसायला लागले. इतके की, त्यांचा आवाज ऐकून भांडणारे थांबले. ‘‘भांडतोय
आम्ही, इथे हसण्यासारखं काय आहे?’’ त्यातल्या एकाने विचारलं. कबीर म्हणाले,
‘‘अरे तू आत्ता जे म्हणालास ना त्यावरच हसायला येतंय मला. तू काय म्हणालास
याला.. उद्या तुला नाही धडा शिकवला तर नाव बदलून टाकेन. म्हणालास ना? एक
म्हणजे ज्या नावाचा तुला एवढा अभिमान आहे ते तू ठेवलेलंच नाहीस आणि दुसरं,
तू धडा कधी शिकवणार? उद्या! एवढा विश्वास आहे तुला तुझ्या पुढल्या क्षणावर?<br />
पाव पल कि सुधी नही, करे कल का साज<br />
काल अचानक मारसी ज्यो तितर को बाज..’’<br />
क्षणात डोळे उघडतात. हाती आलेल्या क्षणाचं महत्त्व क्षणात पटतं.. ज्याला कायम क्षय असतो, तो क्षण ..अशी व्याख्या सुचून जाते.<br />
‘कर्मणि एव अधिकार: ते’च्या चालीवर ‘उपलब्धे क्षणे एव अधिकार: ते’ आत्ताच्या क्षणावरच काय तो आपला अधिकार याची जाणीव होते.</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-90664672169592841992017-03-09T09:59:00.000-08:002017-03-10T10:54:04.638-08:00Old memories with Instant Camera <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाला एक छोटा कॅमेरा घेतला. इन्स्टंट फोटो
निघणाऱ्या कॅमेऱ्याचे सध्या फॅड आहे असे दिसते. (काय गंमत आहे पहा -- फिल्म
कॅमेरे गेले व त्याची जागा डिजिटलने घेतली. आता डिजिटल आहेत पण ते प्रिंट
करायला वेळ लागतो म्हणून व थोडा retro फील येतो म्हणून पुन्हा इन्स्टंट
कॅमेरे आले आहेत. असो.) ह्या निमित्ताने मन खूप वर्षे मागे गेले. मी
साधारण ७ वी मध्ये असेन. कॅमेरा हि तेंव्हा चैनेची गोष्ट होती. दिसेल
त्याचा फोटो काढून फेसबुक व इंस्टाग्राम वर टाकायचे दिवस नव्हते. जे दिसेल
ते डोळ्यांनी पाहायचं आणि जमलं तर मनात साठवायचं एवढंच काय ते साधंसुधं
आयुष्य होतं. पेपर मध्ये जाहिरात यायची व नवीन कॅमेरा कसा आला आहे याबाबत
माहिती असायची. कॅमेरा जवळून पहिला नव्हता व हाताळण्याचा प्रश्नच नव्हता.
पण कुतूहल होत.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyrqHslAFrgKpHMFrLWslsSzJEEn-2-1MHq0rndknzDKrufr9SQHwRaSwie6POtoHBvcf7XzGJL5VDhho8YnV1EeK_X0yLITixJeqkoDqQVNYWKrgUqbcar0rqTZW6o38i9y6AFg/s1600/image.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyrqHslAFrgKpHMFrLWslsSzJEEn-2-1MHq0rndknzDKrufr9SQHwRaSwie6POtoHBvcf7XzGJL5VDhho8YnV1EeK_X0yLITixJeqkoDqQVNYWKrgUqbcar0rqTZW6o38i9y6AFg/s320/image.png" width="320" /></a></div>
<br />
<br />
<br />
<br />
कोडॅकचा हॉट शॉट नावाचा कॅमेरा आला होता. त्याची
खूप जाहिरात यायची. तो इंस्टमॅटिक कॅमेरा होता. मला वाटलं छोटा आहे म्हणजे
स्वस्त (माझी तेंव्हाची स्वस्त ची कल्पना लक्षात घेऊन) असेल. गावात एका
दुकानात खिडकीत त्याची जाहिरात पाहिली व प्रत्येकवेळा जाताना मी तिथे ५-१०
मिनिटे घुटमाळायला लागलो. कालांतराने त्या दुकानदाराला ते कळलं असावं
म्हणून त्याने एक दिवस विचारलं कि काय हवंय. संधीचा फायदा घेऊन मी
कॅमेराची किमंत विचारली. एवढासा मुलगा कॅमेराची किंमत विचारेल अशी त्याला
कल्पना नसावी त्यामुळे थोडासा चिडका सूर लावून त्याने सांगितले २००० रु.
हे म्हणजे माझ्या कल्पनेच्या पलीकडे होते. मी दुकानातून काढता पाय घेतला
पण कॅमेरा कधीतरी घ्यायचा असं मनात घोळत राहिलं. ७ वी ची स्कॉलरशिप ची
परीक्षा दिली व स्कॉलरशिप मिळाली कि कॅमेरा घ्यायचा असं ठरवलं. स्कॉलरशिप
मिळालीही पण ती दर महिन्याला मिळायची व कॅमेरा घेण्याइतकी तर नक्कीच
नव्हती. पैसे साठवून कॅमेरा घेवू असं मनाशी ठरवून एका डब्यात पैसे साठवायला
सुरुवात केली. ८ वी नंतर अभ्यास वाढला व हे मी विसरूनही गेलो. खूप नंतर
मी एक छोटा कॅमेरा व नंतर फिल्मचा SLR घेतला. आता डिजिटल SLR हि घेतला. हा
इन्स्टंट कॅमेरा पाहून जुन्या आठवणी उचंबळून आल्या व तेंव्हाचे दिवस आठवले
इतकंच!</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8473151.post-22778710107828575162017-03-07T20:33:00.003-08:002017-03-07T20:33:41.644-08:00Perfection in art?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
Does art need to be perfect? Isn't the fact that it is "art" itself means there is free-form, creativity and no goal such as perfectionism?<br />
<br />
If a child draws or paints or builds something, probably by imitating another great art, isn't the process of doing it itself rewarding? Why does the end result have to be 'perfect'?<br />
<br />
Perhaps when a budding artist is taught to hone her skills, it is the perfection of the skill, not the end result itself that her teachers are concerned about. Probably, the teacher does not want lack of skill to be a hindrance in art education. I think aiming for perfection in that area is more of skill development. </div>
Unknownnoreply@blogger.com0